शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला, सेकंदांचाही विलंब झाला असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 17:27 IST

Air India Planes Avoid Collision: अवघ्या काही क्षणांमुळे एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्ये एअर इंडिया आणि नेपाळ एअर लाइन्सची विमानं ही हवेत एकमेकांजवळ आली. त्यामुळे काही क्षणांचा विलंब झाला असता तरी त्यांची टक्कर झाली असती.

अवघ्या काही क्षणांमुळे एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्येएअर इंडिया आणि नेपाळ एअर लाइन्सची विमानं ही हवेत एकमेकांजवळ आली. त्यामुळे काही क्षणांचा विलंब झाला असता तरी त्यांची टक्कर झाली असती. सुदैवाने इशारा प्रणालीने पायलटांना सतर्क केले. त्यामुळे एक मोठा विमान अपघात टळला. ही घटना शुक्रवारची आहे. मलेशियाहून येत असलेलं नेपाळ एअर लाइन्सचं विमान आणि आणि दिल्लीहून येत असलेलं एअर इंडियाचं विमान एकमेकांच्या जवळ आल्याने टक्कर होण्याची भीती निर्माण झाली होती.

आज या घटनेची माहिती देताना सीएएएनचे प्रवक्ते जगन्नाथ निरौला यांनी सांगितले की, नेपाळळच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने या बेफिकीरीसाठी वाहतूक नियंत्रणक विभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. शुक्रवारी सकाळी मलेशियाच्या क्वालालंपूर येथून काठमांडू येथे येत असलेलं नेपाळ एअरलाइन्सचं विमान आणि नवी दिल्लीहून काठमांडूकडे येत असलेलं एअर इंडियाचं विमान यांची एकमेकांमध्ये टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

निरौला यांनी सांगितले की, एअर इंडियाचं विमान १९ हजार फुटांवरून खाली येत होतं. तर नेपाळ एअरलाइन्सचं विमान त्याच ठिकाणी १५ हजार फुटांवर होतं. रडारवर हे दिसल्यानंतर नेपाळ एअरलाइन्सचं विमान ७ हजार फूट आणखी खाली आलंय त्यामुळे मोठा अपघात टळला. 

त्यांनी सांगितलं की, हवाई वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणी तपास करण्यासाठी तीन सदस्यीय तपास समितीची स्थापना केली आहे. सीएएएनने या घटनेवेळी कंट्रोल रूमचे प्रभारी असलेल्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर या प्रकरणी एअर इंडियाकडून कुठलंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाNepalनेपाळAccidentअपघात