शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला, सेकंदांचाही विलंब झाला असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 17:27 IST

Air India Planes Avoid Collision: अवघ्या काही क्षणांमुळे एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्ये एअर इंडिया आणि नेपाळ एअर लाइन्सची विमानं ही हवेत एकमेकांजवळ आली. त्यामुळे काही क्षणांचा विलंब झाला असता तरी त्यांची टक्कर झाली असती.

अवघ्या काही क्षणांमुळे एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्येएअर इंडिया आणि नेपाळ एअर लाइन्सची विमानं ही हवेत एकमेकांजवळ आली. त्यामुळे काही क्षणांचा विलंब झाला असता तरी त्यांची टक्कर झाली असती. सुदैवाने इशारा प्रणालीने पायलटांना सतर्क केले. त्यामुळे एक मोठा विमान अपघात टळला. ही घटना शुक्रवारची आहे. मलेशियाहून येत असलेलं नेपाळ एअर लाइन्सचं विमान आणि आणि दिल्लीहून येत असलेलं एअर इंडियाचं विमान एकमेकांच्या जवळ आल्याने टक्कर होण्याची भीती निर्माण झाली होती.

आज या घटनेची माहिती देताना सीएएएनचे प्रवक्ते जगन्नाथ निरौला यांनी सांगितले की, नेपाळळच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने या बेफिकीरीसाठी वाहतूक नियंत्रणक विभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. शुक्रवारी सकाळी मलेशियाच्या क्वालालंपूर येथून काठमांडू येथे येत असलेलं नेपाळ एअरलाइन्सचं विमान आणि नवी दिल्लीहून काठमांडूकडे येत असलेलं एअर इंडियाचं विमान यांची एकमेकांमध्ये टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

निरौला यांनी सांगितले की, एअर इंडियाचं विमान १९ हजार फुटांवरून खाली येत होतं. तर नेपाळ एअरलाइन्सचं विमान त्याच ठिकाणी १५ हजार फुटांवर होतं. रडारवर हे दिसल्यानंतर नेपाळ एअरलाइन्सचं विमान ७ हजार फूट आणखी खाली आलंय त्यामुळे मोठा अपघात टळला. 

त्यांनी सांगितलं की, हवाई वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणी तपास करण्यासाठी तीन सदस्यीय तपास समितीची स्थापना केली आहे. सीएएएनने या घटनेवेळी कंट्रोल रूमचे प्रभारी असलेल्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर या प्रकरणी एअर इंडियाकडून कुठलंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाNepalनेपाळAccidentअपघात