शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

‘इंडिया’च्या बाजूने देशात छुपी लाट! भाजप १८० नव्हे १५० जागा जिंकेल : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 05:37 IST

राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक रोख्यांना जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना म्हणून संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक रोख्यांना जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना म्हणून संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने एक छुपी लाट आहे आणि लोकसभा निवडणुकीत भाजप १५० जागांपर्यंत मर्यादित राहील, असा दावाही त्यांनी केला.

येथे सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणुकीत बेरोजगारी, महागाई यासारखे मोठे मुद्दे आहेत; परंतु भाजप त्यांच्यापासून जनतेचे लक्ष हटवण्यात गुंतलेला आहे. ते मुद्द्यांवर बोलत नाहीत. राजकारण स्वच्छ करण्यासाठी पारदर्शकतेसाठी निवडणूक रोखे आणल्याचा दावा केला जातो, परंतु तसे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने ते का बंद केले, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस-सपा आघाडी चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. १५-२० दिवसांपूर्वी भाजप १८० जागा मिळतील, असे वाटत होते. आता फक्त १५० जागांपर्यंत जातील, असे दिसते. आम्हाला प्रत्येक राज्यातून अहवाल मिळत आहेत की, आमची स्थिती मजबूत होत आहे आणि ‘इंडिया’च्या बाजूने एक सुप्त लाट आहे, असे ते म्हणाले. 

...तर अमेठीतून लढणारउत्तर प्रदेशातील अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले की, अमेठीबाबत पक्ष निर्णय घेईल. मला जो काही आदेश मिळेल, तो मी पाळेन. आमच्या पक्षात हे निर्णय सीईसी (केंद्रीय निवडणूक समिती) बैठकीत घेतले जातात.

ही निवडणूक दोन विचारसरणींतील लढाई मंड्या (कर्नाटक) : आगामी लोकसभा निवडणूक ही दोन विचारसरणींमधील लढाई आहे, एकीकडे राज्यघटनेसाठी लढणारी इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे राज्यघटना आणि लोकशाही संपुष्टात आणू पाहणारी भाजपा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी बुधवारी येथील प्रचारसभेत केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा