शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थयात्रेवरून परतताना ९ जणांवर काळाचा घाला; धावत्या बसला लागली आग; १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 13:41 IST

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी रात्री २ वाजता आग लागली त्यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. कुंडली-मनेसर-पालवाल या एक्स्प्रेस वेवर बसला आग लागून त्यात सहा महिला, तीन पुरुष होरपळून मरण पावले.

गुरुग्राम : हरयाणातील नूह जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एका धावत्या बसला आग लागून त्यातील नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला व १५ जण जखमी झाले. त्यातील प्रवासी मथुरा, वृदांवन येथे तीर्थयात्रा करून आपल्या गावी परत जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. त्यातील प्रवासी पंजाबमधील होशियारपूर, लुधियाना येथील रहिवासी आहेत. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी रात्री २ वाजता आग लागली त्यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. कुंडली-मनेसर-पालवाल या एक्स्प्रेस वेवर बसला आग लागून त्यात सहा महिला, तीन पुरुष होरपळून मरण पावले. जखमी पंधरा लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसला कशामुळे आग लागली याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नसून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.बसला आग लागल्याचे लक्षात येताच काही स्थानिक नागरिकांनी या बसचा पाठलाग केला. त्यानंतर चालकाला सावध करून बस थांबवायला सांगितली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस तसेच अग्निशमन दलाला हा प्रकार कळविला. हरयाणातील नूह जिल्ह्यातील भीषण बस दुर्घटनेचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

उपचार सुरू असलेल्या जखमींची प्रकृती स्थिरनूह जिल्ह्यामध्ये बसला आग लागून झालेल्या जीवितहानीबद्दल हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. जखमींवर शासकीय रुग्णांलयात उपचार सुरू असल्याची त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीदेखील सदर अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 

टॅग्स :fireआगpassengerप्रवासीDeathमृत्यू