शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लग्नाच्या काही तास आधी वडिलांनी केली मुलाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण, ऐकून पोलीसही अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:56 IST

Crime News: मुलग्याच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच जन्मदात्या पित्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील देवली परिसरात घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी वडील फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी गुरवारी रात्री जयपूर येथून ताब्यात घेतलं आहे.

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलग्याच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच जन्मदात्या पित्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील देवली परिसरात घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी वडील फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी गुरवारी रात्री जयपूर येथून ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गौरव सिंघल असं असल्याचं समोर आलं आहे. तो दिल्लीमध्ये जिम चालवत होता. गौरव याची चाकूचे १५ वार करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता देवली एक्सटेंशनमधील राजू पार्कमधून हत्येच्या घटनेची माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलीस आणि पीसीआर व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. या दरम्यान, २९ वर्षीय गौरव सिंघल नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोलीस पोहोचले. तेव्हा तिथे खूप रक्त सांडले होते. चाकूने वार केल्यानंतर गौरवचा मृतदेह ओढून नेण्यात आला होता, असे दिसून आले. गौरवचा मृतदेह नातेवाईकांना लगेच मिळू नये, अशी आरोपीची योजना होती, असं त्यामधून दिसून येत होतं.

गौरव सिंघल याचं लग्न ठरलं होतं. तसेच ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील लोक बाजूच्या खोलीत लग्नाशी संबंधित कार्यक्रमासाठी जमले होते. त्याचदरम्यान वडिलांनी तीन इतर व्यक्तींच्या सोबत मिळून मुलाची हत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. डीसीपी अंकित चौहान यांनी सांगितले की,  गौरवचे वडील रंगलाल सिंघल घरातून पळताना ५० लाख रुपयांचे दागिने आणि १५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी वडिलांचा काही कारणावरून मुलगा गौरव याच्यासोबत वाद झाला होता, त्यावेळी गौरवने वडिलांना मारले होते. त्यानंतर आरोपी रंगलाल याने तीन सहकाऱ्यांसोबत मिळून गौरवची हत्या केली आणि पैसे व दागिने घेऊन फरार झाला.

पोलिसांनी आणखी माहिती देताना सांगितले की, या घटनेमध्ये आणखी एक बाजू समोर आली आहे. मृत गौरव सिंघल याला लग्न करायचं नव्हतं. त्याला दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे तो लग्न करण्यास तयार झाला होता. त्यावरून मुलगा आणि वडिलांमध्ये खूप वाद व्हायचे.  आता ७ मार्च रोजी मध्य रात्री नेमकं काय घडलं, ज्यातून अंकित याची हत्या झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारmarriageलग्न