शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

लग्नाच्या काही तास आधी वडिलांनी केली मुलाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण, ऐकून पोलीसही अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:56 IST

Crime News: मुलग्याच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच जन्मदात्या पित्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील देवली परिसरात घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी वडील फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी गुरवारी रात्री जयपूर येथून ताब्यात घेतलं आहे.

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलग्याच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच जन्मदात्या पित्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील देवली परिसरात घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी वडील फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी गुरवारी रात्री जयपूर येथून ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गौरव सिंघल असं असल्याचं समोर आलं आहे. तो दिल्लीमध्ये जिम चालवत होता. गौरव याची चाकूचे १५ वार करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता देवली एक्सटेंशनमधील राजू पार्कमधून हत्येच्या घटनेची माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलीस आणि पीसीआर व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. या दरम्यान, २९ वर्षीय गौरव सिंघल नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोलीस पोहोचले. तेव्हा तिथे खूप रक्त सांडले होते. चाकूने वार केल्यानंतर गौरवचा मृतदेह ओढून नेण्यात आला होता, असे दिसून आले. गौरवचा मृतदेह नातेवाईकांना लगेच मिळू नये, अशी आरोपीची योजना होती, असं त्यामधून दिसून येत होतं.

गौरव सिंघल याचं लग्न ठरलं होतं. तसेच ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील लोक बाजूच्या खोलीत लग्नाशी संबंधित कार्यक्रमासाठी जमले होते. त्याचदरम्यान वडिलांनी तीन इतर व्यक्तींच्या सोबत मिळून मुलाची हत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. डीसीपी अंकित चौहान यांनी सांगितले की,  गौरवचे वडील रंगलाल सिंघल घरातून पळताना ५० लाख रुपयांचे दागिने आणि १५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी वडिलांचा काही कारणावरून मुलगा गौरव याच्यासोबत वाद झाला होता, त्यावेळी गौरवने वडिलांना मारले होते. त्यानंतर आरोपी रंगलाल याने तीन सहकाऱ्यांसोबत मिळून गौरवची हत्या केली आणि पैसे व दागिने घेऊन फरार झाला.

पोलिसांनी आणखी माहिती देताना सांगितले की, या घटनेमध्ये आणखी एक बाजू समोर आली आहे. मृत गौरव सिंघल याला लग्न करायचं नव्हतं. त्याला दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे तो लग्न करण्यास तयार झाला होता. त्यावरून मुलगा आणि वडिलांमध्ये खूप वाद व्हायचे.  आता ७ मार्च रोजी मध्य रात्री नेमकं काय घडलं, ज्यातून अंकित याची हत्या झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारmarriageलग्न