शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:34 IST

Hindus in Bangladesh: बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात शिवसेना ठाकरे गटालाही केवळ २० जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपाने केलेल्या आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचाराचा ठाकरे गटाला फटका बसल्याचे सांगण्यात येत होते. तसेच हिंदुत्वाबाबत घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळेही ठाकरे गटाचं नुकसान झाल्याचा दावा केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या दिशेने वळत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रियंका चतुर्वेदी लिहितात की, ऑगस्ट महिन्यापासून बांगलादेशमधीलहिंदूंवर हल्ले होत आहेत. त्यांची मंदिरं, घरं आणि उद्योग आस्थापनांना लक्ष्य केलं जात आहे. याबाबत भारत सककारने चिंता व्यक्त केल्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. वैष्णव नेते आणि इस्कॉनचे सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. तीन हिंदू मंदिरांवर हल्ला झाला आहे. तसेच इस्कॉनवर बंदी घालण्याचेही प्रयत्न झाले आहेत. या सर्व प्रकारांमुळे हिंदू आणि अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावणर आहे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रात लिहिले. 

बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात भारत सरकारनं तातडीने पावलं उचलून तेथील काळजीवाहू सरकारशी संपर्क साधावा, अशी मागणीही प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्या लिहितात की, बांगलादेशमध्ये सुरू असलेला धार्मिक तणाव पाहता भारताने तातडीने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच तुम्हीही याबाबत बांगलादेशचे काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करून हिंदूंना लक्ष्य करून होत असलेल्या हिंसाचाराबाबत त्यांना जाब विचारावा, अशी माझी विनंती आहे. त्याबरोबरच बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंच्या जीवित आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठीही आपण संभाव्य मदत आणि बचाव उपाययोजनांबाबत विचार केला पाहिजे, असे आवाहनही प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे