शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
4
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
5
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
6
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
7
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
8
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
9
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
10
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
11
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
12
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
13
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
14
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
16
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
17
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
18
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
19
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
20
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान

बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:34 IST

Hindus in Bangladesh: बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात शिवसेना ठाकरे गटालाही केवळ २० जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपाने केलेल्या आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचाराचा ठाकरे गटाला फटका बसल्याचे सांगण्यात येत होते. तसेच हिंदुत्वाबाबत घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळेही ठाकरे गटाचं नुकसान झाल्याचा दावा केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या दिशेने वळत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रियंका चतुर्वेदी लिहितात की, ऑगस्ट महिन्यापासून बांगलादेशमधीलहिंदूंवर हल्ले होत आहेत. त्यांची मंदिरं, घरं आणि उद्योग आस्थापनांना लक्ष्य केलं जात आहे. याबाबत भारत सककारने चिंता व्यक्त केल्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. वैष्णव नेते आणि इस्कॉनचे सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. तीन हिंदू मंदिरांवर हल्ला झाला आहे. तसेच इस्कॉनवर बंदी घालण्याचेही प्रयत्न झाले आहेत. या सर्व प्रकारांमुळे हिंदू आणि अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावणर आहे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रात लिहिले. 

बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात भारत सरकारनं तातडीने पावलं उचलून तेथील काळजीवाहू सरकारशी संपर्क साधावा, अशी मागणीही प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्या लिहितात की, बांगलादेशमध्ये सुरू असलेला धार्मिक तणाव पाहता भारताने तातडीने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच तुम्हीही याबाबत बांगलादेशचे काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करून हिंदूंना लक्ष्य करून होत असलेल्या हिंसाचाराबाबत त्यांना जाब विचारावा, अशी माझी विनंती आहे. त्याबरोबरच बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंच्या जीवित आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठीही आपण संभाव्य मदत आणि बचाव उपाययोजनांबाबत विचार केला पाहिजे, असे आवाहनही प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे