शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जातनिहाय जनगणनेमुळेच गरिबांची ताकद कळेल; राहुल गांधी यांच्याकडून जोरदार समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:43 IST

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत ते बुधवारी बोलत होते.

बेमेतरा : जातनिहाय जनगणना करणे हा निर्णय ऐतिहासिक असेल. यामुळे संपूर्ण देशाचे चित्र बदलून जाईल. यामुळे देशातील ओबीसी आणि गरिबांना त्यांच्या खऱ्या लोकसंख्येविषयी माहिती मिळेल. त्यांना त्यांची शक्ती कळेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा सर्वांत क्रांतिकारी निर्णय असेल, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचे जोरदार समर्थन केले. 

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत ते बुधवारी बोलत होते. १७ नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. बुधवारी प्रचाराचा अखेरचा दिवस होता. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना म्हटले की, ओबीसी समाजातून निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जोरदार प्रचार करतात; परंतु जेव्हा ओबीसींना त्यांचे हक्क देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते गप्प बसतात. ते म्हणतात, भारतात जात एकच ती म्हणजे गरिबी. 

राहुल गांधी असेही म्हणाले की, नरेंद्र मोदी हे जातनिहाय जनगणना करतील किंवा करणार नाहीत; परंतु, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यास सर्वप्रथम जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर सही केली जाईल. यातूनच गरिबांना त्यांची ताकद समजणार आहे. तुमच्यासोबत राहून तुमच्यासाठी काँग्रेस पक्ष हा निर्णय घेणार आहे. आता कोणतीही शक्ती आम्हाला यापासून अडवू शकणार  नाही. (वृत्तसंस्था) 

शेतकरी, मजूर, युवक अर्थव्यवस्था चालवतात 

बड्या उद्योगपतींना कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, आमची सरकारे असलेल्या कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात सर्व मुख्यमंत्र्यांना मी सांगून ठेवले आहे की, जितका पैसा भाजपकडून अब्जाधीश आणि मोठ्या ठेकेदारांना दिला जातो तितका पैसा काँग्रेसला गरीब, मजूर, शेतकरी माता-भगिनींच्या बँक खात्यात जमा करावा लागेल. कारण, आम्हाला माहीत आहे की, देशाची अर्थव्यवस्था शेतकरी, मजूर, लहान दुकानदार आणि युवक चालवतात.

टॅग्स :chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा