शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मनी लाँड्रींगप्रकरणी ९८% गुन्ह्यांची नोंद आठ वर्षांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 07:24 IST

केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली

शरद गुप्तानवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा-२००२ च्या कायद्यांतर्गत आजवर ५४४२ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यातील ९८ टक्के म्हणजे ५३१० गुन्ह्यांची नोंद गेल्या आठ वर्षांत करण्यात आली. त्यातील ५० टक्के गुन्हे मागील तीन वर्षांत दाखल करण्यात आले.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यान्वये २०१९-२० या कालावधीत ५६२, २०२१-२२ मध्ये ९८१, २०२१-२२ या कालावधीत ११८० गुन्हे दाखल केले. या वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत मनी लाँड्रिंगच्या ५४४२ प्रकरणांत ईडीने १,०४,७०२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. २०१९ ला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली होती. आरोपीला पकडण्यासाठी छापा टाकण्याचे व अटक करण्याचे अधिकार ईडीला देण्यात आले.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारी