शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पावसाचे ९२ बळी, मंगळवारपर्यंत संततधार सुरूच राहण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:49 IST

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य हाती घेतले आहे. ही संततधार सोमवारी, मंगळवारीही सुरूच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गुजरातमध्ये राजकोट जिल्ह्यात पुरात तीन महिला बुडाल्या आहेत. उत्तराखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थानात मुसळधार पावसाने १३ जणांचा बळी घेतला आहे. काश्मिरात एका ५४ वर्षीय उप निरीक्षकाचा बुडून मृत्यू झाला.उत्तर प्रदेशातील पूर्व भागाला मुसळधार पावसाला जोरदार तडाखा बसला आहे. शनिवारी प्रयागराजमध्ये १०२.२ मिमी, तर वाराणसीमध्ये ८४.२ मिमी इतका पाऊस पडला. या भागात यंदा पडलेल्या पावसापेक्षा हे प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्ये पावसामुळे शुक्रवारपासून ७९ जण मरण पावले आहेत. लखनऊ, अमेठी, हरदोई व अन्य काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. पावसाचा तडाखा बसलेल्यांना व पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेआहेत. (वृत्तसंस्था)बिहारमध्ये रुग्णालये जलमय; वैद्यकीय सेवाही कोलमडलीबिहारमध्ये ४८ तासांत मुसळधार पावसाने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. भागलपूरमध्ये पावसामुळे एक भिंत कोसळून तीन जण ठार झाले. पाटणामध्ये नालंदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह अनेक रुग्णालयांत पावसाचे पाणी शिरले असून, त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.रुग्णालयांतील परिसर जलमय झाल्याने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स नेणे कठीण झाल्याने आजारी व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.मुझफ्फरपूर, दरभंगा, पूर्व चंपारण्य, गया, भोजपूर, भागलपूर आदी जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून, तेथील पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवावी, असा आदेश बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रशासनाला दिला आहे. या राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांतील शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :RainपाऊसUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार