शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पावसाचे ९२ बळी, मंगळवारपर्यंत संततधार सुरूच राहण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:49 IST

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य हाती घेतले आहे. ही संततधार सोमवारी, मंगळवारीही सुरूच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गुजरातमध्ये राजकोट जिल्ह्यात पुरात तीन महिला बुडाल्या आहेत. उत्तराखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थानात मुसळधार पावसाने १३ जणांचा बळी घेतला आहे. काश्मिरात एका ५४ वर्षीय उप निरीक्षकाचा बुडून मृत्यू झाला.उत्तर प्रदेशातील पूर्व भागाला मुसळधार पावसाला जोरदार तडाखा बसला आहे. शनिवारी प्रयागराजमध्ये १०२.२ मिमी, तर वाराणसीमध्ये ८४.२ मिमी इतका पाऊस पडला. या भागात यंदा पडलेल्या पावसापेक्षा हे प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्ये पावसामुळे शुक्रवारपासून ७९ जण मरण पावले आहेत. लखनऊ, अमेठी, हरदोई व अन्य काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. पावसाचा तडाखा बसलेल्यांना व पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेआहेत. (वृत्तसंस्था)बिहारमध्ये रुग्णालये जलमय; वैद्यकीय सेवाही कोलमडलीबिहारमध्ये ४८ तासांत मुसळधार पावसाने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. भागलपूरमध्ये पावसामुळे एक भिंत कोसळून तीन जण ठार झाले. पाटणामध्ये नालंदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह अनेक रुग्णालयांत पावसाचे पाणी शिरले असून, त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.रुग्णालयांतील परिसर जलमय झाल्याने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स नेणे कठीण झाल्याने आजारी व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.मुझफ्फरपूर, दरभंगा, पूर्व चंपारण्य, गया, भोजपूर, भागलपूर आदी जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून, तेथील पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवावी, असा आदेश बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रशासनाला दिला आहे. या राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांतील शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :RainपाऊसUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार