शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: 24 तासांत 911 रुग्णांचा मृत्यू; लसीकरण 36 कोटींवर, ४३,२९३ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 09:40 IST

उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,५८, ७२७ असून, देशात आतापर्यंत ४,०५,९३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १.४९ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे. 

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४३,२९३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ९११ रुग्णांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने काळजी निर्माण झाली आहे. देशव्यापी मोहिमेत ३६.८९ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,५८, ७२७ असून, देशात आतापर्यंत ४,०५,९३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १.४९ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे. 

लसीच्या तिसऱ्या डोससाठी फायझर-बायोएनटेक परवानगी मागणार - कोरोना विषाणूच्या मूळ स्ट्रेनवर अधिक परिणामकारक ठरण्यासाठी फायझर-बायोएनटेक कोविड-१९ लस  ‘कोमिरनॅटी’ची तिसरी मात्रा गरजेची ठरू शकते, असे वृत्त शुक्रवारी प्रसार माध्यमांनी कंपन्यांच्या निवेदनाच्या आधारे दिले. दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा समोर आलेला बेटा व्हेरिएंट आणि भारतात सापडलेल्या डेल्टा व्हेरिएंटपासूनही कोविड-१९ लसीची तिसरी मात्रा चांगले संरक्षण देईल, असे सध्या लसीच्या सुरू असलेल्या चाचणीच्या तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अपेक्षित आहे. सार्स-कोव्ह-२ विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटवर लस कमी परिणामकारक असल्याचे सांगितले गेल्यानंतर या घडामोडी घडल्या. 

-     हंगामी चाचणीच्या माहितीने तिसरी मात्रा ही त्याच कोरोना विषाणूंच्या व्हेरिएंटशी लढताना अँटिबॉडीची पातळी पाच ते दहा पटींनी (पहिल्या दोन मात्रांच्या तुलनेत) वाढवते, असे दाखविल्यामुळे फायझर आणि बायोएनटेकने आमच्या कोविड-१९ लसीच्या तिसऱ्या मात्रेला नियामक मान्यता मागत आहोत, असे गुरुवारी जाहीर केले. -     या पार्श्वभूमीवर लसीच्या पहिल्या दोन मात्रा घेतल्याच्या तुलनेत चांगले संरक्षण मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

लाम्बडा विषाणू भारतात नाही-     देशात कोरोनाच्या लाम्बडा या विषाणूचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही असे केंद्राने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाम्बडा विषाणू जगातील तीस देशांमध्ये पसरला आहे. त्यात भारताचा समावेश नाही.-     पेरू या देशातून लाम्बडा विषाणूचा उगम झाला. त्या देशामध्ये दर एक लाख लोकांमागे ५८७ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. -     लाम्बडा विषाणूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही नुकतेच जाहीर केले होते. कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा लाम्बडाचा संसर्ग अधिक वेगाने पसरतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतdoctorडॉक्टर