शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:35 AM

हिज्बुल मुजाहिद्दिनच्या चौघांना टिपले : २४ तासांतील दुसरी धाडसी कारवाई

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचे चार अतिरेकी ठार झाले. रविवारी रेबन गावातील चकमकीत ठार झालेले पाच जमेस धरले, तर जिल्ह्यात दोन दिवसांत एकूण नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

लष्कर, सीआरपीएफ व राज्य पोलिसांनी पिंजोरा गावात रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू केलेली कारवाई सोमवारी दुपारपर्यंत सुरू होती. लपून बसलेल्या अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले असून, त्यांना इस्पितळात दाखल केले गेले आहे. जुलै २०१६ मध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहाण वणी मारला गेल्यापासून शोपियान जिल्हा हे दशतवाद्यांचे मुख्य केंद्र बनल्याचे दिसत आहे. रविवारच्या रेबन येथील चकमकीत ठार झालेल्यांमध्ये हिज्बुलचा कमांडर फारुख असद नल्ली याचाही समावेश होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.गेल्या २४ मार्चला ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यापासून सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींत काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची संख्या आता ५३ वर पोहोचली आहे. (वृत्तसंस्था)अतिरेक्यांनी केली सरपंचाची हत्याश्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारकीपोराचे सरपंच अजय पंडित यांची अतिरेक्यांनी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्याच गावात गोळ्या घालून हत्या केली. अजय पंडित हे काँग्रेस पक्षाचे सदस्यही होते.गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेसच्या प्रवक्त्याने या हत्येचा निषेध केला व पंडित हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, असे म्हटले. या हत्येची अजून कोणत्याही अतिरेकी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही.जम्मू : यावर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये ८८ अतिरेक्यांना (त्यात काही टॉप कमांडर्सही होते) ठार मारण्यात आले असून इतर २८० जणांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सोमवारी येथे दिली.सीमेपलीकडून काश्मीर खोºयात अनेक अतिरेकी घुसवून हिंसाचार वाढवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे सिंग म्हणाले.नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही दोन प्रकारचे धोरण राबवत आहोत. याशिवाय अतिरेक्यांच्या संघटनांत स्थानिक युवकांनी जाऊ नये म्हणूनही प्रयत्न करीत आहोत. यात आम्हाला बरेच यश आले आहे, असे सिंग यांनी वार्ताहरांना सांगितले.24 तासांत हिज्बुल मुजाहिदीनच्या ९ अतिरेक्यांना दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात ठार मारण्यात आल्याचा संदर्भ देऊन सिंग म्हणाले की, सुरक्षादलांचा प्रयत्न हा खोºयातून दहशतवाद नियंत्रणात आणून पुसून टाकण्याचा आहे.02 आठवड्यांत नऊ मुख्य मोहिमांमध्ये सहा टॉप कमांडर्ससह मारल्या गेलेल्या २२ अतिरेक्यांंनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईJammu Kashmirजम्मू-काश्मीर