शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

८९ टक्के साक्षर वायनाडने राहुल गांधींना का निवडले ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 6:27 PM

साक्षरतेत आघाडीवर असलेल्या वायनाडने राहुल गांधी यांना निवडले. तसेच भविष्यातील १०० टक्के साक्षर भारतात राहुल गांधींना पसंती मिळणार याचे तर है धोतक नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. 

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी करताना ३०० चा टप्पा पार केला. तर एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील आपल्या पारंपरिक अमेठीतून मतदार संघात पराभव पत्करावा लागला. परंतु, वायनाडमधूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राहुल यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

अमेठीतून पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांची जेवढी चर्चा झाली, त्या तुलनेत वायनाडमधील त्यांच्या मताधिक्याकडे गांभीर्याने पहिले गेले नाही. नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना राहुल यांचा वायनाड मतदारसंघ अचानक चर्चेत आला आहे. साक्षरता आणि येथे असलेली विविध धर्मांची आकडेवारी यामुळे वायनाड चर्चेत आले आहे. यामध्ये साक्षरता मुद्दा अधिक गाजत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वायनाडमधून तब्बल ७ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. तर त्यांचे मताधिक्य चार लाखांच्या घरात आहे. मात्र चर्चा आहे, की वायनाडमध्ये ८९ टक्के साक्षर जनता असून त्यांनी राहुल गांधी यांना निवडून दिले. येथील जातीची समीकरणे पाहिल्यास, वायनाड जिल्ह्यात ५० टक्के हिंदू, २८ टक्के मुस्लीम आणि २१ टक्के ख्रिश्चन आहेत. मात्र ही आकडेवारी मतदार संघाची नसून जिल्ह्याची आहे. त्यामुळे यावर शंका आहे.

दरम्यान 'डेटा नेट' या वेबसाईटनुसार वायनाड मतदार संघात हिंदू, मुस्लीम अनुक्रमे ४० आणि ४५ टक्के आहेत. तर १५ टक्के ख्रिश्चन आहेत. त्यामुळे सात लाख मते घेणाऱ्या राहुल यांना साक्षर मतदारांचे मते मिळालेच शिवाय हिंदू आणि मुस्लीम दोघांची मते मिळाल्याचे स्पष्ट होते. यावरून आश्चर्य याचे व्यक्त होते की, साक्षरतेत आघाडीवर असलेल्या वायनाडने राहुल गांधी यांना निवडले. तसेच भविष्यातील १०० टक्के साक्षर भारतात राहुल गांधींना पसंती मिळणार याचे तर है धोतक नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. 

वाराणसीत ७७ टक्के साक्षरता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवली. या मतदार संघाचे मोदी दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. वाराणसीमधून मोदींनी तब्बल ६ लाख ७४ हजार ६६४ मते घेतली. याच वारणसीत साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के आहे. मात्र ८९ टक्केच साक्षर असलेल्या केरळमध्ये भाजपला इतर राज्यांच्या तुलनेत फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे कमी साक्षरता असलेल्या मतदार संघात भाजपला लाभ तर होत नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.