शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जम्मू-काश्मिरात २४ तासांत ८ अतिरेकी ठार; भारतीय जवानांनी ठोकलं 'शतक'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 2:32 AM

दोन चकमकींचे यश : आयईडीचा स्फोट घडविण्याचा कट उधळला गेला; यावर्षी १०० अतिरेकी संपवले

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन स्वतंत्र चकमकींत आणखी सहा अतिरेकी मारले गेले. यामुळे मारल्या गेलेल्यांची संख्या आता ८ झाली आहे. शुक्रवारी दोन अतिरेकी पुलवामा चकमकीत आणि चार अतिरेकी शोपियानमधील कारवाईत मारले गेले, असे अधिकारी म्हणाला.दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या पॅम्पोर भागातील मीज येथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी गुरुवारी सकाळी त्यांचा शोध सुरू केला. त्या भागाला त्यांनी घेरल्यानंतर अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यात एक अतिरेकी मारला गेला, तर इतर दोन अतिरेकी जवळच्या मशिदीत शिरले. संपूर्ण रात्रभर मशिदीभोवती सुरक्षादलाचे कर्मचारी होते. शुक्रवारी सकाळी सुरक्षादलांनी अतिरेकी बाहेर यावेत म्हणून अश्रुधूर सोडला. मशिदीचे पावित्र्य राखत सुरक्षादलांनी दोन अतिरेक्यांना ठार मारले.या कारवाईत एकूण तीन अतिरेकी मारले गेले. अतिरेकी मशिदीबाहेर यावेत यासाठी ना गोळीबार केला गेला ना आयईडीचा वापर, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. संयम आणि व्यावसायिकता कामाला आली. गोळीबार किंवा आयईडीचा वापर न करता फक्त अश्रुधुराचा वापर केला. मशिदीचे पावित्र्य राखले गेले. मशिदीत लपलेले दोन्ही अतिरेकी मारले गेले, असे कुमार म्हणाले. शोपियानच्या मुनंद-बंदपावा भागात गुरुवारी सुरू केलेल्या अतिरेकीविरोधी कारवाईत शुक्रवारी सकाळी चार अतिरेकी मारले गेले, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. या भागात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना शोधण्यात आले. २४ तासांत एकूण ८ अतिरेकी दोन चकमकींत मारले गेले. यावर्षी एकूण १०० अतिरेक्यांना सुरक्षादलांनी ठार मारले आहे. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला. हे खतरनाक अतिरेकी हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तयबाशी संबंधित आहेत. (वृत्तसंस्था)राजौरी जिल्ह्यात पाककडून तोफमाराजम्मू : पाकिस्तानी लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शुक्रवारी कोणतेही कारण नसताना तोफमारा केला. भारतीय लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले, असे अधिकारी म्हणाला. सकाळी १०.४५ वाजता पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांतून नौशेरा सेक्टरमध्ये (राजौरी जिल्हा) मारा केला.नियंत्रण रेषेवरील जंगलात आगजम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेवरील मानकोटे सेक्टरमध्ये जंगलात लागलेल्या मोठ्या आगीमुळे भूसुरुंगांचे स्फोट झाले, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानकडून घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षादलांनी जमिनीत हे सुरुंग पेरून ठेवलेले होते.आमच्याकडे अतिरेकी आयईडीने हल्ले करणार असल्याची माहिती आली होती. पाकिस्तानी जैशचा कमांडर अदनान आणि कुलगाममध्ये वाहीद भाई होते. त्यांनी काही घातपात करायच्या आधीच आम्ही त्यांना नष्ट केले, असे विजय कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर