शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लग्न मंडपात भरधाव ट्रक घुसला; 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 10:02 IST

लग्न मंडपात भरधाव वेगाने येणारा ट्रक घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देलग्न मंडपात भरधाव वेगाने येणारा ट्रक घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे.जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

लखीसराय - बिहारच्या लखीसरायमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. लग्न मंडपात भरधाव वेगाने येणारा ट्रक घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री (10 जुलै) ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखीसरायच्या हलसी बाजार परिसरात एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न समारंभाला मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती. मात्र बुधवारी रात्री समारंभ सुरू असताना भरधाव वेगाने येणारा एक ट्रक अचानक मंडपात घुसला. ट्रकखाली चिरडले गेल्याने आठ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून याचा तपास सुरू करण्यात आले आहे. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक लग्न मंडपात घुसल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांनी या दुर्घटनेनंतर आक्रोश केला. तसेच काही काळ रास्ता रोको केला होता. नुकसान भरपाईची मागणी ही मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. सध्या या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBiharबिहार