शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

लग्न मंडपात भरधाव ट्रक घुसला; 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 10:02 IST

लग्न मंडपात भरधाव वेगाने येणारा ट्रक घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देलग्न मंडपात भरधाव वेगाने येणारा ट्रक घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे.जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

लखीसराय - बिहारच्या लखीसरायमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. लग्न मंडपात भरधाव वेगाने येणारा ट्रक घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री (10 जुलै) ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखीसरायच्या हलसी बाजार परिसरात एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न समारंभाला मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती. मात्र बुधवारी रात्री समारंभ सुरू असताना भरधाव वेगाने येणारा एक ट्रक अचानक मंडपात घुसला. ट्रकखाली चिरडले गेल्याने आठ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून याचा तपास सुरू करण्यात आले आहे. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक लग्न मंडपात घुसल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांनी या दुर्घटनेनंतर आक्रोश केला. तसेच काही काळ रास्ता रोको केला होता. नुकसान भरपाईची मागणी ही मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. सध्या या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBiharबिहार