शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये बिनविरोध मंजूर झाले ७५ टक्के आरक्षण विधेयक; नवा फॉर्म्युला कसा असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 15:49 IST

आतापर्यंत मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्ग यांना ३० टक्के आरक्षण मिळत होते. परंतु नव्या विधेयकानुसार हे आरक्षण ४३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

पटना – बिहारमध्ये नीतीश सरकारनं विधानसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला. या विधेयकानुसार, बिहारमध्ये आता मागासवर्गीय, अति मागासवर्गीय, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती यांना ६५ टक्के आरक्षण मिळण्याची तरतूद आहे. सध्या बिहारमध्ये या प्रवर्गांना ५० टक्के आरक्षण मिळते. जातीय जणगणना रिपोर्ट आल्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्यात ६५ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आज विधानसभेत आरक्षण दुरुस्ती विधेयक २०२३ मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे या विधेयकाला कुणीही विरोध केला नाही.

बिहार राज्यात आता एकूण ७५ टक्क्यापर्यंत आरक्षणाची मर्यादा असेल आणि उर्वरीत २५ टक्के खुल्या वर्गासाठी ठेवले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आरक्षण दुरुस्ती विधेयक सभागृहात आणले. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे राज्यात ७५ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाच्या आमदारांनीही सरकारने आणलेल्या या विधेयकाचे समर्थन केले. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे मान्यतेसाठी जाईल. बिहारमध्ये एकूण ६५ टक्के आरक्षण मागासवर्गीयांसाठी आणि १० टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी असेल.

कोणाला किती मिळणार आरक्षण?

बिहार कॅबिनेटमध्ये मंगळवारी जातीनिहाय आरक्षण ५० टक्क्यांवरून वाढवून ६५ टक्के करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्ग यांना ३० टक्के आरक्षण मिळत होते. परंतु नव्या विधेयकानुसार हे आरक्षण ४३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यासोबतच अनुसुचित जातीसाठी १६ टक्के आरक्षण होते, ते वाढून २० टक्के केले आहे. तर अनुसुचित जमातीसाठी १ टक्के आरक्षण दिले जात होते. त्याची मर्यादा आता २ टक्के करण्यात आली आहे. त्याशिवाय केंद्र सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना EWS नुसार १० टक्के आरक्षण मिळून एकूण ७५ टक्के आरक्षण करण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत पारित करण्यात आला.

जातनिहाय जणगणनेच्या रिपोर्टनंतर नवा फॉर्म्युला

खरे तर बिहार विधानसभेत जात सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर काही तासांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये राज्यातील मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ते सभागृहाने मंजूरही केले.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारreservationआरक्षण