शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

बिहारमध्ये बिनविरोध मंजूर झाले ७५ टक्के आरक्षण विधेयक; नवा फॉर्म्युला कसा असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 15:49 IST

आतापर्यंत मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्ग यांना ३० टक्के आरक्षण मिळत होते. परंतु नव्या विधेयकानुसार हे आरक्षण ४३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

पटना – बिहारमध्ये नीतीश सरकारनं विधानसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला. या विधेयकानुसार, बिहारमध्ये आता मागासवर्गीय, अति मागासवर्गीय, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती यांना ६५ टक्के आरक्षण मिळण्याची तरतूद आहे. सध्या बिहारमध्ये या प्रवर्गांना ५० टक्के आरक्षण मिळते. जातीय जणगणना रिपोर्ट आल्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्यात ६५ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आज विधानसभेत आरक्षण दुरुस्ती विधेयक २०२३ मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे या विधेयकाला कुणीही विरोध केला नाही.

बिहार राज्यात आता एकूण ७५ टक्क्यापर्यंत आरक्षणाची मर्यादा असेल आणि उर्वरीत २५ टक्के खुल्या वर्गासाठी ठेवले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आरक्षण दुरुस्ती विधेयक सभागृहात आणले. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे राज्यात ७५ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाच्या आमदारांनीही सरकारने आणलेल्या या विधेयकाचे समर्थन केले. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे मान्यतेसाठी जाईल. बिहारमध्ये एकूण ६५ टक्के आरक्षण मागासवर्गीयांसाठी आणि १० टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी असेल.

कोणाला किती मिळणार आरक्षण?

बिहार कॅबिनेटमध्ये मंगळवारी जातीनिहाय आरक्षण ५० टक्क्यांवरून वाढवून ६५ टक्के करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्ग यांना ३० टक्के आरक्षण मिळत होते. परंतु नव्या विधेयकानुसार हे आरक्षण ४३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यासोबतच अनुसुचित जातीसाठी १६ टक्के आरक्षण होते, ते वाढून २० टक्के केले आहे. तर अनुसुचित जमातीसाठी १ टक्के आरक्षण दिले जात होते. त्याची मर्यादा आता २ टक्के करण्यात आली आहे. त्याशिवाय केंद्र सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना EWS नुसार १० टक्के आरक्षण मिळून एकूण ७५ टक्के आरक्षण करण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत पारित करण्यात आला.

जातनिहाय जणगणनेच्या रिपोर्टनंतर नवा फॉर्म्युला

खरे तर बिहार विधानसभेत जात सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर काही तासांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये राज्यातील मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ते सभागृहाने मंजूरही केले.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारreservationआरक्षण