शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

थरूर यांच्यासह ७ खासदार करणार शिष्टमंडळांचे नेतृत्व, जगापुढे फाडणार पाकचा बुरखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 07:01 IST

पक्षाने नाव न देताही शशी थरूर यांचा समावेश केल्याने काँग्रेस संतप्त, महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे...

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध देशांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांची यादी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केंद्र सरकारने काँग्रेसची संमती न घेताच शशी थरूर यांचा शिष्टमंडळात समावेश केला. यामुळे काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारने या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी यांच्या खांद्यावर टाकली आहे. या सात शिष्टमंडळामध्ये चार नेते सत्ताधारी एनडीएमधील असून तीन इंडिया आघाडीकडून आहेत.

सुरेश प्रभूंची झाली आठवणशशी थरूर यांच्या निमित्ताने सुरेश प्रभू यांची आठवण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात सामील करायचे होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून प्रभू यांच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले. परंतु, ठाकरे यांनी अनंत गिते यांचे नाव पाठविले. यानंतर मोदी यांनी भाजपच्या कोट्यातून प्रभू यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले होते. 

ही सरकारची दुष्ट खेळी : काँग्रेससर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या प्रमुखपदी शशी थरूर यांची केलेली निवड ही केंद्र सरकारने दुष्ट हेतूने केलेली खेळी आहे, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, राज्यसभेचे खासदार डॉ. सय्यद नासीर हुसैन आणि लोकसभेचे सदस्य राजा ब्रार यांच्या नावाची शिफारस केली होती, असे जयराम रमेश यांनी म्हटले.

मात्र, काँग्रेसने सुचविले नव्हते तरी सरकारने शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी शशी थरूर यांची निवड केली. याउलट, काँग्रेसने सरकारला जी नावे दिली होती त्यातील एकाही नेत्याचा शिष्टमंडळात समाविष्ट करण्यात आले नाही. शिष्टमंडळासाठी काँग्रेसने जी नावे दिली आहेत, त्यात बदल होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.हा तर माझा सन्मान : शशी थरूर

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक्सवर लिहिले की, पाच महत्त्वाच्या देशांमध्ये जाऊन भारताचे मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने मला निमंत्रित केले हा मला सन्मान वाटतो. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येईल व अशा ठिकाणी माझी गरज भासेल तेव्हा मी कधीही मागे हटणार नाही.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान