शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

थरूर यांच्यासह ७ खासदार करणार शिष्टमंडळांचे नेतृत्व, जगापुढे फाडणार पाकचा बुरखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 07:01 IST

पक्षाने नाव न देताही शशी थरूर यांचा समावेश केल्याने काँग्रेस संतप्त, महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे...

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध देशांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांची यादी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केंद्र सरकारने काँग्रेसची संमती न घेताच शशी थरूर यांचा शिष्टमंडळात समावेश केला. यामुळे काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारने या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी यांच्या खांद्यावर टाकली आहे. या सात शिष्टमंडळामध्ये चार नेते सत्ताधारी एनडीएमधील असून तीन इंडिया आघाडीकडून आहेत.

सुरेश प्रभूंची झाली आठवणशशी थरूर यांच्या निमित्ताने सुरेश प्रभू यांची आठवण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात सामील करायचे होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून प्रभू यांच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले. परंतु, ठाकरे यांनी अनंत गिते यांचे नाव पाठविले. यानंतर मोदी यांनी भाजपच्या कोट्यातून प्रभू यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले होते. 

ही सरकारची दुष्ट खेळी : काँग्रेससर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या प्रमुखपदी शशी थरूर यांची केलेली निवड ही केंद्र सरकारने दुष्ट हेतूने केलेली खेळी आहे, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, राज्यसभेचे खासदार डॉ. सय्यद नासीर हुसैन आणि लोकसभेचे सदस्य राजा ब्रार यांच्या नावाची शिफारस केली होती, असे जयराम रमेश यांनी म्हटले.

मात्र, काँग्रेसने सुचविले नव्हते तरी सरकारने शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी शशी थरूर यांची निवड केली. याउलट, काँग्रेसने सरकारला जी नावे दिली होती त्यातील एकाही नेत्याचा शिष्टमंडळात समाविष्ट करण्यात आले नाही. शिष्टमंडळासाठी काँग्रेसने जी नावे दिली आहेत, त्यात बदल होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.हा तर माझा सन्मान : शशी थरूर

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक्सवर लिहिले की, पाच महत्त्वाच्या देशांमध्ये जाऊन भारताचे मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने मला निमंत्रित केले हा मला सन्मान वाटतो. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येईल व अशा ठिकाणी माझी गरज भासेल तेव्हा मी कधीही मागे हटणार नाही.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान