शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

थरूर यांच्यासह ७ खासदार करणार शिष्टमंडळांचे नेतृत्व, जगापुढे फाडणार पाकचा बुरखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 07:01 IST

पक्षाने नाव न देताही शशी थरूर यांचा समावेश केल्याने काँग्रेस संतप्त, महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे...

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध देशांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांची यादी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केंद्र सरकारने काँग्रेसची संमती न घेताच शशी थरूर यांचा शिष्टमंडळात समावेश केला. यामुळे काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारने या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी यांच्या खांद्यावर टाकली आहे. या सात शिष्टमंडळामध्ये चार नेते सत्ताधारी एनडीएमधील असून तीन इंडिया आघाडीकडून आहेत.

सुरेश प्रभूंची झाली आठवणशशी थरूर यांच्या निमित्ताने सुरेश प्रभू यांची आठवण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात सामील करायचे होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून प्रभू यांच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले. परंतु, ठाकरे यांनी अनंत गिते यांचे नाव पाठविले. यानंतर मोदी यांनी भाजपच्या कोट्यातून प्रभू यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले होते. 

ही सरकारची दुष्ट खेळी : काँग्रेससर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या प्रमुखपदी शशी थरूर यांची केलेली निवड ही केंद्र सरकारने दुष्ट हेतूने केलेली खेळी आहे, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, राज्यसभेचे खासदार डॉ. सय्यद नासीर हुसैन आणि लोकसभेचे सदस्य राजा ब्रार यांच्या नावाची शिफारस केली होती, असे जयराम रमेश यांनी म्हटले.

मात्र, काँग्रेसने सुचविले नव्हते तरी सरकारने शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी शशी थरूर यांची निवड केली. याउलट, काँग्रेसने सरकारला जी नावे दिली होती त्यातील एकाही नेत्याचा शिष्टमंडळात समाविष्ट करण्यात आले नाही. शिष्टमंडळासाठी काँग्रेसने जी नावे दिली आहेत, त्यात बदल होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.हा तर माझा सन्मान : शशी थरूर

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक्सवर लिहिले की, पाच महत्त्वाच्या देशांमध्ये जाऊन भारताचे मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने मला निमंत्रित केले हा मला सन्मान वाटतो. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येईल व अशा ठिकाणी माझी गरज भासेल तेव्हा मी कधीही मागे हटणार नाही.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान