शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

लखीमपूर खीरीमधील हिंसेप्रकरणी 7 जणांना अटक, आता STF करेल तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 12:18 IST

Lakhimpur Khiri Violence: या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

लखीमपूर खीरी:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये रविवारी सायंकाळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांचे वाहन शेतकरी आंदोलनात घुसल्याने काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंत उत्तर प्रदेशातात वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता या प्रकरणाचा तपास एसटीएफ वर्ग करण्यात आलाय. 

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गुन्हामिळालेल्या माहितीनुसार, एसटीएफ सोमवारी संध्याकाळपासूनच तपासाची सूत्रे हाती घेईल. दुसरीकडे, हिंसाचारानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन पोलिसांनी 24 जणांची ओळख पटवली आहे. यासोबतच पोलीसांनी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. यापूर्वी, या प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 लोकांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट आणि बंडखोरीसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नुकसान भरपाईची मागणीदरम्यान, या घटनेनंतर लखीमपूर जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक झाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतीय.

अनेक नेते पोलिसांच्या ताब्यातया प्रकरणानंतर लखीमपूर खीरी पासून लखनऊपर्यंत अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणही शिगेला पोहचले आहे. लखीमपूरच्या दिशेने जाणाऱ्या अखिलेश यादव, प्रियंका गांधी, शिवपाल यादव, राम गोपाल यादव, संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विरोधकांचा आरोप आहे की त्यांना पीडितांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही.

राजकारण करू नका

दुसरीकडे, विरोधकांच्या वृत्तीवर कठोर भूमिका घेत योगी सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, विरोधी पक्ष या दुर्दैवी घटनेवर राजकारण करत आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. तपासाशिवाय कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य नाही. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा दिली जाईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादव