शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

लखीमपूर खीरीमधील हिंसेप्रकरणी 7 जणांना अटक, आता STF करेल तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 12:18 IST

Lakhimpur Khiri Violence: या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

लखीमपूर खीरी:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये रविवारी सायंकाळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांचे वाहन शेतकरी आंदोलनात घुसल्याने काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंत उत्तर प्रदेशातात वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता या प्रकरणाचा तपास एसटीएफ वर्ग करण्यात आलाय. 

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गुन्हामिळालेल्या माहितीनुसार, एसटीएफ सोमवारी संध्याकाळपासूनच तपासाची सूत्रे हाती घेईल. दुसरीकडे, हिंसाचारानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन पोलिसांनी 24 जणांची ओळख पटवली आहे. यासोबतच पोलीसांनी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. यापूर्वी, या प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 लोकांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट आणि बंडखोरीसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नुकसान भरपाईची मागणीदरम्यान, या घटनेनंतर लखीमपूर जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक झाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतीय.

अनेक नेते पोलिसांच्या ताब्यातया प्रकरणानंतर लखीमपूर खीरी पासून लखनऊपर्यंत अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणही शिगेला पोहचले आहे. लखीमपूरच्या दिशेने जाणाऱ्या अखिलेश यादव, प्रियंका गांधी, शिवपाल यादव, राम गोपाल यादव, संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विरोधकांचा आरोप आहे की त्यांना पीडितांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही.

राजकारण करू नका

दुसरीकडे, विरोधकांच्या वृत्तीवर कठोर भूमिका घेत योगी सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, विरोधी पक्ष या दुर्दैवी घटनेवर राजकारण करत आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. तपासाशिवाय कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य नाही. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा दिली जाईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादव