शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

लखीमपूर खीरीमधील हिंसेप्रकरणी 7 जणांना अटक, आता STF करेल तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 12:18 IST

Lakhimpur Khiri Violence: या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

लखीमपूर खीरी:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये रविवारी सायंकाळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांचे वाहन शेतकरी आंदोलनात घुसल्याने काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंत उत्तर प्रदेशातात वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता या प्रकरणाचा तपास एसटीएफ वर्ग करण्यात आलाय. 

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गुन्हामिळालेल्या माहितीनुसार, एसटीएफ सोमवारी संध्याकाळपासूनच तपासाची सूत्रे हाती घेईल. दुसरीकडे, हिंसाचारानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन पोलिसांनी 24 जणांची ओळख पटवली आहे. यासोबतच पोलीसांनी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. यापूर्वी, या प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 लोकांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट आणि बंडखोरीसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नुकसान भरपाईची मागणीदरम्यान, या घटनेनंतर लखीमपूर जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक झाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतीय.

अनेक नेते पोलिसांच्या ताब्यातया प्रकरणानंतर लखीमपूर खीरी पासून लखनऊपर्यंत अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणही शिगेला पोहचले आहे. लखीमपूरच्या दिशेने जाणाऱ्या अखिलेश यादव, प्रियंका गांधी, शिवपाल यादव, राम गोपाल यादव, संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विरोधकांचा आरोप आहे की त्यांना पीडितांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही.

राजकारण करू नका

दुसरीकडे, विरोधकांच्या वृत्तीवर कठोर भूमिका घेत योगी सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, विरोधी पक्ष या दुर्दैवी घटनेवर राजकारण करत आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. तपासाशिवाय कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य नाही. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा दिली जाईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादव