शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:31 IST

तंबाखूच्या विक्रीतून कमाईपेक्षा नुकसान अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सिगारेट आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचे देशात  प्रमाण सातत्याने वाढत आहे. यामुळे भविष्यात गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे १८.३ लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य विविध आजारांमुळे होतो. असे असतानाही देशात दररोज ६,५०० नवे तरुण तंबाखूचे सेवन करण्यास सुरुवात होते.

... तर १५० वर्षे लागणार

या वेगामुळे दरवर्षाला तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये २४ लाख जणांची भर पडत असते. तंबाखूजन्य आजारांविरोधात सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेला देशात तुलनेत फारच कमी यश मिळताना दिसत आहे. सध्या ज्या गतीने तंबाखू वापरावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार तंबाखू संपूर्णपणे सोडायला १५२ वर्षे लागतील. तोंडाचा कर्करोग, फुप्फुसे, हृदयविकार, स्ट्रोक, श्वसन आजार आदी आजारांसाठी तंबाखू हे प्रमुख कारण आहे.

२८ कोटींहून अधिक तंबाखू तसेच तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करणारे लोक आहेत, अशी माहिती ग्लोबल अ‍ॅडल्ड टोबॅको सर्व्हेतून पुढे आली. १.८२ लाख कोटींचे आर्थिक नुकसान देशाला दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे होते. हे जीडीपीच्या १ टक्क्यापेक्षा अधिक आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून सरकारला मिळणाऱ्या महसुलापेक्षा हे नुकसान अधिक आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या ध्येयांनुसार २०३० पर्यंत अकाली मृत्यू कमी करायचा असेल, तर तंबाखू सोडणे अत्यावश्यक आहे. तंबाखू सोडण्यासाठी १८००-११-२३५६ ही हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे.  ‘आम्ही तयार आहोत’ ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली जाईल.-डॉ. रामनाथ मिश्रा, संचालक, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीCigaretteसिगारेट