शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:31 IST

तंबाखूच्या विक्रीतून कमाईपेक्षा नुकसान अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सिगारेट आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचे देशात  प्रमाण सातत्याने वाढत आहे. यामुळे भविष्यात गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे १८.३ लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य विविध आजारांमुळे होतो. असे असतानाही देशात दररोज ६,५०० नवे तरुण तंबाखूचे सेवन करण्यास सुरुवात होते.

... तर १५० वर्षे लागणार

या वेगामुळे दरवर्षाला तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये २४ लाख जणांची भर पडत असते. तंबाखूजन्य आजारांविरोधात सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेला देशात तुलनेत फारच कमी यश मिळताना दिसत आहे. सध्या ज्या गतीने तंबाखू वापरावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार तंबाखू संपूर्णपणे सोडायला १५२ वर्षे लागतील. तोंडाचा कर्करोग, फुप्फुसे, हृदयविकार, स्ट्रोक, श्वसन आजार आदी आजारांसाठी तंबाखू हे प्रमुख कारण आहे.

२८ कोटींहून अधिक तंबाखू तसेच तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करणारे लोक आहेत, अशी माहिती ग्लोबल अ‍ॅडल्ड टोबॅको सर्व्हेतून पुढे आली. १.८२ लाख कोटींचे आर्थिक नुकसान देशाला दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे होते. हे जीडीपीच्या १ टक्क्यापेक्षा अधिक आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून सरकारला मिळणाऱ्या महसुलापेक्षा हे नुकसान अधिक आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या ध्येयांनुसार २०३० पर्यंत अकाली मृत्यू कमी करायचा असेल, तर तंबाखू सोडणे अत्यावश्यक आहे. तंबाखू सोडण्यासाठी १८००-११-२३५६ ही हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे.  ‘आम्ही तयार आहोत’ ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली जाईल.-डॉ. रामनाथ मिश्रा, संचालक, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीCigaretteसिगारेट