शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Delhi Election 2019 : 'आमचे सरकार आल्यास 600 युनिटपर्यंत मोफत वीज देणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 07:47 IST

Delhi Vidhan Sabha Election 2019 : 'छोट्या उद्योगांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत'

नवी दिल्ली : झारखंडनंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने अद्याप दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली नाही. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यांनतर काँग्रेसनेही दिल्लीवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. 

दिल्लीतील वजीरपूर परिसरात काँग्रेसने बुधवारी जनसभा आयोजित केली. यावेळी दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, "अरविंद केजरीवाल सरकारकडून दिल्लीवासीयांना फक्त 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळत आहे. मात्र, दिल्लीत आमचे सरकार आल्यानंतर 600 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येईल. तसेच, छोट्या उद्योगांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. याचा उल्लेख पक्षाच्या जाहिरनाम्यात करण्यात येणार आहे."  

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आतापर्यंत जेवढी विकास कामे झाली नाही. तेवढी विकास कामे गेल्या पाच वर्षात दिल्लीत आम आदमी पार्टीच्या सरकारने केली आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.  

दुसरीकडे, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे. केजरीवाल सरकारने 509 शाळा आणि 20 नवीन महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, असे काहीच केले नाही. याशिवाय, दिल्लीतील रुग्णालयांमध्ये आयसीयू, बेड आणि व्हेंटिलेटर यांसारख्या आवश्यक सुविधा सुद्धा नाही. एवढेच नाही तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: जलबोर्डाचे चेअरमन आहेत. तरी सुद्धा दिल्लीतील जनतेला दूषित पाणी प्यावे लागले, असे भाजपाचे दिल्लीतील अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसBJPभाजपा