शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

भारत-पाक सीमेवर ६० किमीचे कुंपण, खुल्या जागा सुरक्षित करणार, गृहमंत्री आमित शाहांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 07:43 IST

India-Pakistan Border: पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली.

हजारीबाग (झारखंड) - ‘पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील आणि या दोन्ही बाजूंच्या सुमारे ६० किमी अंतरातील मोकळ्या जागांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली.

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५९व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पथसंचलनाची सलामी घेतल्यानंतर शाह बोलत होते. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने नऊ वर्षांत भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सुमारे ५६० किमी अंतरावरील कुंपण आणि अंतर भरून काढले आहे. भारताच्या पश्चिम आणि पूर्वेकडील या दोन सीमांमधील सर्व मोकळ्या जागा भरल्या जात आहेत आणि केवळ ६० किमीचे काम शिल्लक आहे, असे शाह म्हणाले. सीमेवर अनेक ठिकाणी पाणी, डोंगराळ आणि दलदलीचा भाग आहे आणि येथे कुंपण घालणे खूप कठीण काम आहे. 

‘बीएसएफ’ने सीमारक्षक म्हणून ठसा उमटवला‘बीएसएफ’च्या स्थापनादिनी, मी या उत्कृष्ट दलाचे कौतुक करतो, ज्याने आमच्या सीमांचे संरक्षक म्हणून ठसा उमटवला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदत कार्यादरम्यान ‘बीएसएफ’च्या भूमिकेचेही मला कौतुक करायचे आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सुरक्षेला प्राधान्यगृहमंत्री म्हणाले की, देशात जेव्हा-जेव्हा भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा सीमा सुरक्षेला प्राधान्य दिले गेले, मग ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असो किंवा मोदी सरकार. आम्ही रेल्वे, रस्ते, जलमार्ग कनेक्टिव्हिटी आणि टेलिफोन संपर्क मजबूत केला आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहIndiaभारतPakistanपाकिस्तान