शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारत-पाक सीमेवर ६० किमीचे कुंपण, खुल्या जागा सुरक्षित करणार, गृहमंत्री आमित शाहांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 07:43 IST

India-Pakistan Border: पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली.

हजारीबाग (झारखंड) - ‘पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील आणि या दोन्ही बाजूंच्या सुमारे ६० किमी अंतरातील मोकळ्या जागांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली.

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५९व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पथसंचलनाची सलामी घेतल्यानंतर शाह बोलत होते. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने नऊ वर्षांत भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सुमारे ५६० किमी अंतरावरील कुंपण आणि अंतर भरून काढले आहे. भारताच्या पश्चिम आणि पूर्वेकडील या दोन सीमांमधील सर्व मोकळ्या जागा भरल्या जात आहेत आणि केवळ ६० किमीचे काम शिल्लक आहे, असे शाह म्हणाले. सीमेवर अनेक ठिकाणी पाणी, डोंगराळ आणि दलदलीचा भाग आहे आणि येथे कुंपण घालणे खूप कठीण काम आहे. 

‘बीएसएफ’ने सीमारक्षक म्हणून ठसा उमटवला‘बीएसएफ’च्या स्थापनादिनी, मी या उत्कृष्ट दलाचे कौतुक करतो, ज्याने आमच्या सीमांचे संरक्षक म्हणून ठसा उमटवला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदत कार्यादरम्यान ‘बीएसएफ’च्या भूमिकेचेही मला कौतुक करायचे आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सुरक्षेला प्राधान्यगृहमंत्री म्हणाले की, देशात जेव्हा-जेव्हा भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा सीमा सुरक्षेला प्राधान्य दिले गेले, मग ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असो किंवा मोदी सरकार. आम्ही रेल्वे, रस्ते, जलमार्ग कनेक्टिव्हिटी आणि टेलिफोन संपर्क मजबूत केला आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहIndiaभारतPakistanपाकिस्तान