शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक सीमेवर ६० किमीचे कुंपण, खुल्या जागा सुरक्षित करणार, गृहमंत्री आमित शाहांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 07:43 IST

India-Pakistan Border: पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली.

हजारीबाग (झारखंड) - ‘पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील आणि या दोन्ही बाजूंच्या सुमारे ६० किमी अंतरातील मोकळ्या जागांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली.

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५९व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पथसंचलनाची सलामी घेतल्यानंतर शाह बोलत होते. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने नऊ वर्षांत भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सुमारे ५६० किमी अंतरावरील कुंपण आणि अंतर भरून काढले आहे. भारताच्या पश्चिम आणि पूर्वेकडील या दोन सीमांमधील सर्व मोकळ्या जागा भरल्या जात आहेत आणि केवळ ६० किमीचे काम शिल्लक आहे, असे शाह म्हणाले. सीमेवर अनेक ठिकाणी पाणी, डोंगराळ आणि दलदलीचा भाग आहे आणि येथे कुंपण घालणे खूप कठीण काम आहे. 

‘बीएसएफ’ने सीमारक्षक म्हणून ठसा उमटवला‘बीएसएफ’च्या स्थापनादिनी, मी या उत्कृष्ट दलाचे कौतुक करतो, ज्याने आमच्या सीमांचे संरक्षक म्हणून ठसा उमटवला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदत कार्यादरम्यान ‘बीएसएफ’च्या भूमिकेचेही मला कौतुक करायचे आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सुरक्षेला प्राधान्यगृहमंत्री म्हणाले की, देशात जेव्हा-जेव्हा भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा सीमा सुरक्षेला प्राधान्य दिले गेले, मग ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असो किंवा मोदी सरकार. आम्ही रेल्वे, रस्ते, जलमार्ग कनेक्टिव्हिटी आणि टेलिफोन संपर्क मजबूत केला आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहIndiaभारतPakistanपाकिस्तान