शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

फटाके फोडणाऱ्यांना 6 महिने तर साठवण करणाऱ्यांना 3 वर्षांची शिक्षा; अरविंद केजरीवाल यांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 16:56 IST

राजधानी दिल्लीत फटाक्यांवर आधीपासून बंदी होतीच, आता सरकारने नियम आणखी कठोर केले आहेत.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत फटाक्यांवर आधीपासून बंदी होतीच, आता सरकारने आणखी एक फर्मान काढून दंडाची घोषणा केली आहे. राजधानीत कोणीही फटाके फोडताना आढळल्यास त्याला 200 रुपये दंड ठोठावला जाईल, आणि 6 महिने तुरुंगवासही भोगावा लागू शकतो, असा आदेश दिल्ली सरकारने काढला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

साठवण करणाऱ्यांना 3 वर्षांची शिक्षाफटाके फोडणाऱ्यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासासह 200 रुपये दंड आकारला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर जो कोणी फटाक्यांची साठवणूक करतो, किंवा विक्री करतो, अशांना 5000 रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो. या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सरकारने 408 ग्रुप तयार केले आहेत. 

अनेक टीम्स तयारसहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, दिल्ली पोलिसांच्या 210 टीम्स, आयकर विभागाच्या 165 टीम्स आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या 33 टीम तैनात केल्या जाणार आहेत. गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्लीत लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी 'दिवे लावा, फटाके फोडू नका' ही मोहीम सुरू केली जाईल. कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये सरकार स्वतः 51 हजार दिवे लावणार आहे. 

किती दिवस बंदी कायम राहणार?सरकारच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 2,917 किलो फटाके जप्त केल्याची माहितीही राय यांनी दिली. विशेष म्हणजे, सरकारचा हा आदेश पुढील वर्षी 1 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केजरीवाल सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे. 

टॅग्स :fire crackerफटाकेdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल