शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

केरळात मुसळधार पावसाचे ५७ बळी, दीड लाख नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 04:46 IST

केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून, पूर आणि भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे

तिरुवनंतपुरम : केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून, पूर आणि भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षितपणे शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसांत कोझीकोड आणि मलप्पुरममध्ये २० लोकांचा, तर वायनाडमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ९८८ शिबिरांत १ लाख ६५ हजार ५१९ लोक आहेत. वायनाडमधून सर्वाधिक २४ हजार ९९० लोकांनी या शिबिरात आश्रय घेतला आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्यापही काही लोक मलप्पुरम आणि वायनाड येथे भूस्खलनामुळे ढिगाºयाखाली असल्याची शक्यता आहे. तेथे मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बाणसूर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याचे संकेतही त्यांनी दिले.यूएईचे नागरिकांना आवाहनदुबई : संयुक्त अरब अमिरातने (यूएई) केरळमध्ये जाऊ इच्छिणाºया आपल्या देशातील नागरिकांना असे आवाहन केले आहे की, पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगावी. केरळात अनेक भागांत पुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला. तिरुवनंतपुरममधील वाणिज्य दूतावासाने असे आवाहन केले आहे की, केरळात जाणाºया यूएईच्या नागरिकांनी दूतावासात नोंदणी करावी. जेणेकरून, त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल.कर्नाटकातीलपूरस्थिती आणखी गंभीर; ६ हजार कोटींचे नुकसानबंगळुरू : कर्नाटकात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने शनिवारी पूरस्थिती आणखी गंभीर बनली आहे. तथापि, नागरिकांनी काळजी करू नये, सरकार सर्वतोपरी मदत करील, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मदत आणि पुनर्वसन ही आमची प्राथमिकता आहे. राज्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. अर्थमंत्रालयाने मदतीसाठी तात्काळ १०० कोटी रुपये जारी केले आहेत.सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. बेळगावशिवाय बागलकोट, विजयपुरा, रायचूर, यादगीर, गडग, उत्तर कन्नड, हावेरी, हुबळी-धारवाड, दक्षिण कन्नड, चिकमंगळूर आणि कोडागू या जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. सक्लेशपूरमध्ये मरानाहल्लीजवळ भूस्खलन झाले आहे. कन्नड जिल्ह्यात नेत्रवती नदीला आलेल्या पुरामुळे मंगळुरू गाव जलमय झाले आहे. ज्या भागात अधिक पूर आहे तिथे चार हेलिकॉप्टरने मदतकार्य सुरू आहे. ६ तासांत तीन नौकांमधून २७० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.कर्नाटकात २६ जणांचा मृत्यू : मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराने ६००० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ४५ वर्षांतील हा सर्वात मोठा पूर आहे. आम्ही केंद्र सरकारकडे ३००० कोटी रुपयांची मागणी केली आहे. काही गावांची तर पूर्णपणे नव्याने उभारणी करण्याची गरज आहे. आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :floodपूरKeralaकेरळKarnatakकर्नाटक