शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

Video: ५२ वर्षे झाली, आजही माझ्याकडे घर नाही; राहुल गांधींनी सांगितला भावुक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 16:10 IST

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला

छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. यादरम्यान, त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. मात्र, सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. तर, काँग्रेसच्या याच कार्यक्रमान खासदार राहुल गांधी यांनी भूतकाळातील, बालपणीच्या भावूक आठवणींचा किस्सा सांगितला. तसेच, आज ५२ वर्षे झाली, मला राहायला घर नाही, असेही राहुल गांधींनी म्हटले. अलाहाबाद येथे जे घर आहे, तेही आमचे नाही, असेही त्यांनी म्हटले.  

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला. मी वयाच्या ६ वर्षांचा होतो, तेव्हा आम्हाला राहता बंगला सोडून जायचं होतं. सन १९७७ ची गोष्ट आहे, निवडणूक आली होती, मला काहीही कळत नव्हतं. घरी वेगळंच वातावरण होतं. मी आईकडे गेलो आणि आईला विचारलं काय झालंय. तेव्हा आईने सांगितलं, आपण हे घर सोडतोय. तोपर्यत ते घर आमचंच आहे, असं मला वाटायचं. पण, आईने सांगितलं, राहुल हे आपलं घर नाही, हे सरकारी घर आहे. मग, मी प्रश्न केला आई कुठे जायचंय, तर आई म्हटली, माहिती नाही. मला काहीच समजेना. कारण, ते घर मी आमचंच समजत होतो. ५२ वर्षे झाली माझ्याकडे घर नाही, आजपर्यंत माझ्याकडे घर नाही, असा भावनिक किस्सा राहुल गांधींनी या अधिवेशनात सांगितला. मी १२ तुलघक रोडवर राहतो, पण माझ्यासाठी ते घर नाही. 

मी काश्मीर ते कन्याकुमार पायी प्रवास केला होता. भारत जोडो यात्रेत मला घर मिळालं. गेल्या ४ महिन्यात रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक भारतीयांसोबत माझं घर होतं. दरम्यान, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेतील अनेक आठवणही यावेळी कथित केल्या.  

मी कधीच निवृत्त होणार नाही

"मी कधीच निवृत्त झाली नव्हती आणि कधीच होणार नाही" असं काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ही माहिती दिली आहे. या मुद्द्यावर सोनिया गांधींशी चर्चा झाल्याचं अलका लांबा यांनी म्हटलं आहे. अलका यांनी "मी मॅडमना निवृत्तीशी संबंधित बातम्या मीडियामध्ये आल्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या की, मी कधीच निवृत्त झाली नाही आणि भविष्यातही होणार नाही" असं म्हटलं आहे. 

"१९९८ साली मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. २५ वर्षात पक्षाने अनेक मोठे यश संपादन केले आहे आणि निराशाही आली आहे. २००४ आणि २००९ मध्ये आमच्या विजयाबरोबरच मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले, पण मला याचा सर्वाधिक आनंद आहे. अध्यक्ष  म्हणून कार्यकाळात 'भारत जोडो यात्रे'ने संपुष्टात आली. यामुळे काँग्रेस आणि जनता यांच्यातील संवादाचा वारसा समृद्ध झाल्याचे" सोनिया गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसHomeसुंदर गृहनियोजनBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राSonia Gandhiसोनिया गांधी