शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

दोन महिलांमध्ये रंगला सामना; तू-तू मी-मी मध्ये ७२ लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली ५१० कोटींची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 14:10 IST

एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्य रंगला होता सामना

ठळक मुद्देगहलोत सरकारनं सुरू केली लिलाव प्रक्रियाएकाच कुटुंबातील दोन महिलांमध्य रंगला होता सामना

राजस्थानमध्ये सध्या मद्यविक्रीच्या दुकांनांचा लिलाव सुरू आहे. यामध्ये अमुमानगढ जिल्ह्यातील कुईंयां गावातील एका मद्यविक्रीच्या दुकानासाठी बोली प्रक्रिया सुरू होती. या मद्य विक्रीच्या दुकानाची बोली ही ७२ लाखांपासून सुरू झाली पण ती थांबण्याचं नावच घेत नव्हती. या मद्यविक्रीच्या दुकानावर आपलाच ताबा असावा यासाठी एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये सुरू झालेल्या चढाओढीमुळे सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही लिलावाची प्रक्रिया रात्री २ वाजता संपली. कुटुंबातील एका महिलेनं ७२ लाखांचं दुकान चक्क ५१० कोटी रूपयांना विकत घेतलं. गेल्या वर्षी कुईंयां गावातील मद्यविक्रीच्या दुकानाची ६५ लाख रूपयांना विक्री करण्यात आली होती. यावर्षी या दुकानासाठी बोली प्रक्रिया ७२ लाखांपासून सुरू करण्यात आले. परंतु या दुकानाच्या खरेदीवरुन एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये तू तू मी मी करत सामना रंगला. यानंतर सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा सामना रात्री २ वाजता ५१० कोटी रूपयांवर संपला. इतकी मोठी बोली लागल्यामुळे आता उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. ५१० कोटींची बोलीउत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री २ वाजता ही बोली प्रक्रिया संपल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरूवात केली आहे. ५१० कोटी रूपयांची बोली लावणाऱ्या या महिलेचं नाव किरण कंवर असं असून त्यांना आता दोन दिवसांच्या आत ही रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना यावर अद्यापही विश्वास होत नाहीये. परंतु या लिलावाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना त्यांना अलॉटमेंट लेटर जारी केलं आहे. तसंच जर विजेत्यानं आता दुकान विकत घेतलं नाही तर पुढील वेळेपासून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असल्याचंही विभागानं स्पष्ट केलं आहे. गहलोत सरकारनं सुरू केली लिलाव प्रक्रियाराजस्थानमध्ये अशाप्रकारे या प्रक्रियेद्वारे विक्री करण्यात येत असल्याचा लोकांकडूनही विरोध करण्यात आला आहे. ज्या दुकानांची पाच ते दहा लाखांत विक्री होत होती त्यांची यावेळी पाच ते दहा कोटी रूपयांत विक्री झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी बेरोजगारांना संधी देण्यासाठी आणि मद्याची अवैधरित्या विक्री थांबवणअयासाठी बोली प्रक्रिया बंद केली होती. तसंच या ठिकाणी लॉटरी सिस्टम सुरू करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १५ वर्ष जुनी व्यवस्था संपवून पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरू केली. यातून सरकारला हजारो कोटी रूपयांचा महसूलही मिळाला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतChief Ministerमुख्यमंत्री