शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

देशामध्ये २0२४ पर्यंत सरकार उभारणार १00 नवी विमानतळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 3:49 AM

सध्या मोठे उद्योग व व्यवसाय मोठ्या शहरांत वा त्यांच्या आसपास केंद्रित होत आहेत. तिथे असलेल्या पायाभूत सुविधा हेच त्याचे कारण आहे.

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उद्योजक, व्यावसायिक यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी आणि पर्यटनास चालना मिळावी म्हणून सरकारने येत्या पाच वर्षांत देशात १00 नवीन विमानतळे उभारण्याचे ठरविले आहे. याखेरीज देशातील १ हजार शहरांना विमान वाहतुकीने जोडण्यात येणार आहे.

सरकार जे १ हजार हवाई मार्ग सुरू करेल, ते बहुतांशी लहान शहरांना जोडणारे असतील. म्हणजेच लहान शहरांमध्येही विमानसेवा सुरू होईल. या विमानसेवांमुळे लहान शहरांमध्येही व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी गुंतवणूकदार तयार होतील, लहान शहरांत उद्योग, व्यवसाय आल्यास तिथे रोजगारनिर्मिती होईल आणि तेथील अर्थव्यवस्थेलाही गती मिळू शकेल. इतकी विमानतळे व नवे मार्ग सुरू करण्यासाठी विमानांची आणि वैमानिकांची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे २0२४ पर्यंत विमानांची संख्या दुप्पट करून, ती १२00 वर नेण्याचा आणि दरवर्षी ६00 तरुणांना वैमानिकाचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत लहान व मध्यम आकाराच्या शहरांतील पायाभूत सुविधांवर तसेच इतर सर्व बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

सध्या मोठे उद्योग व व्यवसाय मोठ्या शहरांत वा त्यांच्या आसपास केंद्रित होत आहेत. तिथे असलेल्या पायाभूत सुविधा हेच त्याचे कारण आहे. अशा सुविधा लहान व मध्यम आकाराच्या शहरांत देण्यावर बैठकीत एकमत झाले. याशिवाय देशातील कोणत्याही लहान वा मध्यम शहरात अखंड वीज व पाणीपुरवठा तसेच चांगले रस्ते आणि जवळ रेल्वे स्थानके या सुविधा देण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे.गुंतवणूकदारांची सोयग्रामीण भाग व लहान शहरांत स्वस्त रोजगार, कौशल्य उपलब्धता आणि उत्तम पायाभूत सुविधा यांद्वारे चीनशी स्पर्धा करणे शक्य आहे, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लहान शहरांत जमिनींचे भाव, बांधकाम खर्चही तुलनेने कमी असतो. याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळू शकतो, असे चीनच्या अनुभवातून दिसून आले आहे. चीनने पुढील १५ वर्षांत ४५0 व्यावसायिक विमानतळे उभारण्याचे ठरविले आहे. तितके इथे करणे लगेच शक्य नसले तरी त्यादृष्टीने तयारी सुरू केली जाणार आहे.

टॅग्स :Airportविमानतळ