शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

500 बेपत्ता मुलांना मिळाला जगण्याचा 'आधार'!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 10:20 AM

आधारच्या माध्यमातून 500 बेपत्ता मुलांचा शोध लागला आहे. यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी ही माहिती सार्वजनिक केली आहे.

नवी दिल्ली- सर्व व्यवहार एका बटनावर आणण्याचे प्रयत्न असल्यानं मोबाईल, बँक खाती आधारशी जोडण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. आधारच्या या सक्तीला अनेकांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत. परंतु याच आधारच्या माध्यमातून 500 बेपत्ता मुलांचा शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी हे सार्वजनिक केलं आहे. ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबरस्पेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.काही बेपत्ता झालेली मुलं अनाथाश्रमात होती. मात्र ज्यावेळी ती मुलं आधार नोंदणीसाठी गेली, त्यावेळी त्यांचा 12 अंकी बायोमेट्रिक क्रमांक आधीच अस्तित्वात असल्याचं समोर आलं. त्यामुळे या मुलांच्या कुटुंबीयांचा थांगपत्ता लावणं सहज शक्य झालं, अशी माहिती पांडे यांनी दिली आहे. हरवलेली मुलं अनेक वर्षांनी त्यांच्या कुटुंबीयांना आधारमुळेच भेटल्याचं भूषण पांडे यांनी सांगितलं आहे.भारतातल्या लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकसंख्या 18 वर्षांखालील मुलांची आहे. लहानग्यांसाठी कार्यरत असलेल्या क्राय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशात हरवलेल्या आणि बेपत्ता असणाऱ्या मुलांचे प्रमाण 2013-15 या दोन वर्षांच्या काळात 84 टक्के वाढले होते. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, दर दिवशी सरासरी 180 मुलं बेपत्ता होतात. विविध सरकारी योजनांना आधार जोडणी केल्यामुळे यंत्रणांमधून बनावट नावे काढली गेली असून, त्यामुळे आतापर्यंत १० अब्ज डॉलरची बचत झाली आहे, अशी माहितीही पांडे यांनी दिली. देशात 99 टक्के तरुणांकडे आधार कार्ड असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डbankबँकIndiaभारत