शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती; राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 06:33 IST

कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाह्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यापुढे कोरोनाने जे रुग्ण मरण पावतील, त्यांच्याही कुटुंबीयांना ही मदत दिली जाईल.

नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल. आतापर्यंत देशात सुमारे ४ लाख ४६ हजार जण कोरोनाचे बळी ठरले आहेत.  कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाह्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यापुढे कोरोनाने जे रुग्ण मरण पावतील, त्यांच्याही कुटुंबीयांना ही मदत दिली जाईल.

३० दिवसांत निर्णय घ्यावा- मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची रक्कम मिळण्यासाठी सरकारी छापील अर्ज संबंधित डॉक्टर वा रुग्णालय यांच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण सहायता निधी अधिकारी वा त्यांच्या कार्यालयात सादर करावा लागेल.- या अर्जावर संबंधित यंत्रणेला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. - आर्थिक मदत लाभार्थ्याच्या बँकेत थेट जमा करण्यात येईल. - आलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती असेल. - कोणताही अर्ज फेटाळताना त्याचे स्पष्ट कारण लेखी स्वरूपात देण्याची जबाबदारी या समितीची असेल.

कोणत्या राज्यात किती मृत्यू?महाराष्ट्र        १,३८,६१६कर्नाटक           ३७,६४८तामिळनाडू           ३५,३७९केरळ        २३,८९७ उत्तर प्रदेश        २२,८८७दिल्ली       २०,०८५ 

काेर्टाने केली होती विचारणानैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबास ज्या प्रकारे अर्थसाह्य दिले जाते, तोच निकष कोरोनाच्या मृतांबाबत का लावत नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्ये केंद्राला विचारला होता. तसेच मृत्यूच्या दाखल्यावर कोरोनाचा उल्लेख असावा, असेही सांगितले होते.

दोन डोसमधील अंतर कमी होणार?खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या कोविशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये सध्या असलेले १२ ते १६ आठवड्यांचे अंतर कमी करून ते चार आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे. केरळ उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या एका आदेशानंतर सरकार हे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय