शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

कुणालाही लक्षात ठेवयची इच्छा होणार नाही हे 'जीवघेणं वर्ष' 2020; 'ही' आहेत 5 मोठी कारणं

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 31, 2020 21:07 IST

एका अदृष्य शत्रूने संपूर्ण जगालाच गुडघे टेकायला भाग पाडले. लाखोंचे बळी घेतले. या अदृष्य शत्रूला पराभूत करण्यासाठी आजूनही प्रयत्न सुरूच आहेत.

नवी दिल्ली - कोरोना महामारीने वर्ष 2020 हे अत्यंत कटू बनवले आहे. यामुळे हे वर्ष लक्षात ठेवायची कुणाचीही इच्छा होणार नाही. एका अदृष्य शत्रूने संपूर्ण जगालाच गुडघे टेकायला भाग पाडले. लाखोंचे बळी घेतले. या अदृष्य शत्रूला पराभूत करण्यासाठी आजूनही प्रयत्न सुरूच आहेत. खरे तर 2020 विसरण्याचे आणखीही अनेक कारणे आहेत, मात्र, या 5 कारणांनी 2020 अत्यंत कटू बनवले.

कोरोनाने लाखो बळी घेतले -कोरोना महामारीने जगभरात आतापर्यंत 18 लाखहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर 8 कोटींहून अधिक लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. एकट्या भारतातच 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा दीड लाखवर पोहोचला आहे. त्यामुळे, असे जीवघेणे वर्ष कुणाला लक्षात ठेवायची इच्छा होईल?

स्थलांतरीत मजुरांच्या हतबलतेचे दृष्य, आजही डोळ्यात पाणी आणते -कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांचे अत्यंत हाल झाले. त्यांचे ते दृष्य आजही पाहिले, की डोळ्यात पाणी उभे राहते. त्यावेळचे या मजुरांचे पलायन हे अभूतपूर्व होते. डोक्यावर उन तळपत असताना या मजुरांनी शेकडो किलेमिटरची पायपीट करून आपले घर गाठले. अनेकांचा रस्त्यातच तर अनेकांचा घरी पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. अनेक मजूर तर ट्रक, टँकरमध्ये अक्षरशः जणावरांपेक्षाही वाईट स्थितीत आपल्या खरी पोहोचले. अनेक मजुरांचा अपघातातही मृत्यू झाला.

अर्थव्यवस्था घसरली, लाखो नोकऱ्या गेल्या -कोरोना महामारीचा फटका केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या अर्थव्यवस्थेला बसला. भारतीय अर्थव्यवस्था पहिल्यांदाच मंदीच्या सावटात पोहोचली. यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एवढेच नाही, तर अनेकांच्या वेतनातही कपात झाली. खरे तर अनेकांच्या रोजी रोटीचाच प्रश्न कोरोनाने उभा केला होता. मात्र आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे.

देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एदा दंगल -देशाची राजधानी असलेल्या दिल्लीवर फेब्रुवारी 2020मध्ये पुन्हा एकदा दंगलीचा डाग लागला. नॉर्थ-ईस्ट दिल्लीमध्ये 24 आणि 25 फेब्रुवारीला भीषण सांप्रदायिक दंगे झाले. यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

हाथरस कांड -ज्या प्रमाणे 2012मध्ये निर्भया सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला होता, अगदी त्याच प्रमाणे 2020 मध्येही हाथरस प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. उत्तर प्रदेशातील हथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार झाला. आरोपींनी तिचा मृत्यू झाल्याचे समजून तिला सोडून दिले. नंतर 29 सप्टेंबला दिल्लीतील एका रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. यामुद्द्यावरून देशातील राजकारणही मोठ्या प्रमाणावर तापले होते. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. यानंतर सीबीआयने चार्जशीट दाखल केली आहे. 

टॅग्स :New Yearनववर्षcorona virusकोरोना वायरस बातम्याHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार