शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चार वर्षांमध्ये किती रोजगार, लवकरच सांगणार मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 07:23 IST

रोजगार निर्मितीवरुन केल्या जाणाऱ्या टीकेला सरकार उत्तर देणार

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार लवकरच चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. चौथ्या वर्षपूर्तीनिमित्तानं सरकारकडून रोजगार निर्मितीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र यामध्ये मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी अनेकदा केली आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांमध्ये रोजगाराच्या किती संधी निर्माण झाल्या, याची माहिती सरकार देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मंत्रालयांना त्यांच्या विभागांकडून प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे निर्माण झालेल्या रोजगारांची आकडेवारीची माहिती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीची योजना तयार करणारी समिती या माहितीला प्राधान्य देत असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. 'सर्व मंत्रालयं आणि संबंधित विभाग ठराविक कालावधीत त्यांच्या कामाची माहिती देत असतात. आता सर्व मंत्रालयं आणि विभागांना रोजगार निर्मितीची आकडेवारी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या संधी नेमक्या किती वाढल्या, याची माहिती सरकारच्या विशेष समितीकडून गोळा केली जात आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली.सर्व क्षेत्रांमधील माहिती जमा केल्यावर एक चांगला अहवाल तयार होईल अशी आशा आहे, असं समितीमधील एका सदस्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. रोजगार निर्मितीच्या मुद्यावरुन काँग्रेसनं वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका वर्षात 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन पाळण्यात मोदी अपयशी ठरले, अशी टीका काँग्रेसनं अनेकदा केली आहे. राहुल गांधींनी या मुद्यावरुन मोदींवर वारंवार शरसंधान साधलं आहे. 'चीन दर 24 तासात 50 हजार तरुणांना रोजगार देतं. मात्र मोदी सरकारला 24 तासांमध्ये रोजगाराच्या केवळ 450 संधी निर्माण करता येतात,' अशी टीका राहुल गांधींनी केली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरीBJPभाजपा