शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

उत्तर भारतात थंडीच्या लाटेचे ४२ बळी; काही भागांत पारा शून्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:35 IST

मराठवाडा, विदर्भात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता

नवी दिल्ली/लखनऊ/मुंबई : नाताळ संपून नववर्षाकडे वाटचाल सुरू असताना उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, मध्य प्रदेश, पंजाब या सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली असून, आतापर्यंत या थंडीने गारठून उत्तर प्रदेशमध्ये ४२ जण मरण पावले आहेत. त्यापैकी दोन जण दिल्लीनजीकच्या नॉयडा येथील आहेत. जम्मूमध्ये दोन व हरयाणातही एक जण थंडीमुळे मरण पावला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर १ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांत सतत होणारी बर्फवृष्टी आणि थंड वारे यांमुळे अवघा उत्तर भारत तीन दिवसांपासून पार गारठून गेला आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजता उघडणारी दुकाने १0 वाजल्यानंतर सुरू होतात. सरकारी कार्यालयांमध्येही उपस्थिती कमी असते. चहाच्या टपऱ्यांपाशी लोकांची गर्दी होत आहे. तसेच संध्याकाळी सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहेत.राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा शून्याखाली आला आहे. पिलानीमध्ये उणे 0.५ इतके तापमान नोंदविले गेले. फतेपूरमध्ये तापमान उणे ३ होते. दिल्लीच्या काही भागांतही शनिवारी सकाळी तापमान १ ते २ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. रस्त्यांवर राहणाºया लोकांनी निवारागृहांकडे धाव घेतली आहे.काश्मीरमध्येही थंडीचा कहर असून, श्रीनगरमधील दाल लेक गोठून गेला आहे. लेहमध्ये तापमान उणे १८ अंश इतके होते. पहलगाममध्ये उणे १२.७ तर गुलमर्गमध्ये उणे ११.२ अंश तापमानाची नोंद झाली.उत्तराखंडमधील आठ शहरांमध्येही तापमान २ अंशांखाली आहे. चमोलीमधील जोशीमठ आणि कुमाऊं च्या मुक्तेश्वर येथे ते शून्याखाली गेले आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा, मंडी, सोलन, सिरमौर व उना येथेही थंडीची लाट आहे.राज्यातही कडाकामुंबई : कडाक्याच्या थंडीने शनिवारी महाराष्ट्र गारठला. सर्वात कमी तापमान नागपूर येथे ५.१ अंश होते. विदर्भातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १० अंशांखाली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये तापमान ८ अंश होते. मुंबईत मात्र थंडी कमी आहे. ईशान्येकडेही गारठामध्य प्रदेश व पंजाबच्या काही भागांमध्ये तापमान २ ते उणे १ च्या दरम्यान आहे. अमृतसर व जालंधरमध्ये थंडीचा इतका कहर आहे की, रस्त्यांवर शुकशुकाट आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा तसेच ईशान्येकडील सिक्कीम तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांतही कडाक्याची थंडी जाणवत आहे.