शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

उत्तर भारतात थंडीच्या लाटेचे ४२ बळी; काही भागांत पारा शून्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:35 IST

मराठवाडा, विदर्भात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता

नवी दिल्ली/लखनऊ/मुंबई : नाताळ संपून नववर्षाकडे वाटचाल सुरू असताना उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, मध्य प्रदेश, पंजाब या सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली असून, आतापर्यंत या थंडीने गारठून उत्तर प्रदेशमध्ये ४२ जण मरण पावले आहेत. त्यापैकी दोन जण दिल्लीनजीकच्या नॉयडा येथील आहेत. जम्मूमध्ये दोन व हरयाणातही एक जण थंडीमुळे मरण पावला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर १ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांत सतत होणारी बर्फवृष्टी आणि थंड वारे यांमुळे अवघा उत्तर भारत तीन दिवसांपासून पार गारठून गेला आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजता उघडणारी दुकाने १0 वाजल्यानंतर सुरू होतात. सरकारी कार्यालयांमध्येही उपस्थिती कमी असते. चहाच्या टपऱ्यांपाशी लोकांची गर्दी होत आहे. तसेच संध्याकाळी सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहेत.राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा शून्याखाली आला आहे. पिलानीमध्ये उणे 0.५ इतके तापमान नोंदविले गेले. फतेपूरमध्ये तापमान उणे ३ होते. दिल्लीच्या काही भागांतही शनिवारी सकाळी तापमान १ ते २ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. रस्त्यांवर राहणाºया लोकांनी निवारागृहांकडे धाव घेतली आहे.काश्मीरमध्येही थंडीचा कहर असून, श्रीनगरमधील दाल लेक गोठून गेला आहे. लेहमध्ये तापमान उणे १८ अंश इतके होते. पहलगाममध्ये उणे १२.७ तर गुलमर्गमध्ये उणे ११.२ अंश तापमानाची नोंद झाली.उत्तराखंडमधील आठ शहरांमध्येही तापमान २ अंशांखाली आहे. चमोलीमधील जोशीमठ आणि कुमाऊं च्या मुक्तेश्वर येथे ते शून्याखाली गेले आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा, मंडी, सोलन, सिरमौर व उना येथेही थंडीची लाट आहे.राज्यातही कडाकामुंबई : कडाक्याच्या थंडीने शनिवारी महाराष्ट्र गारठला. सर्वात कमी तापमान नागपूर येथे ५.१ अंश होते. विदर्भातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १० अंशांखाली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये तापमान ८ अंश होते. मुंबईत मात्र थंडी कमी आहे. ईशान्येकडेही गारठामध्य प्रदेश व पंजाबच्या काही भागांमध्ये तापमान २ ते उणे १ च्या दरम्यान आहे. अमृतसर व जालंधरमध्ये थंडीचा इतका कहर आहे की, रस्त्यांवर शुकशुकाट आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा तसेच ईशान्येकडील सिक्कीम तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांतही कडाक्याची थंडी जाणवत आहे.