शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

आसाममध्ये 24 तासांत 416 जणांना अटक; कारण जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 13:02 IST

सरमा म्हणाले, "ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलत राहू."

आसाम सरकारने बालविवाहाविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. यासंदर्भात बोलताना, राज्यात बालविवाहाविरोधातील कारवाईच्या तिसऱ्या टप्प्यात 416 जणांना अटक करण्यात आली आहे. 21-22 डिसेंबरच्या रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली होती, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी रविवारी दिली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी 335 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बाल विवाहविरोधात आसाम सरकार स्ट्रिक्ट -आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. सरमा म्हणाले, "ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलत राहू. राज्य सरकारने 2023 मध्ये फेब्रुवारी आणि ऑक्टोबर या दोन टप्प्यांत बालविवाहविरोधी मोहीम सुरू केली होती. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात 4,515 गुन्हे दाखल करून 3,483 जणांना अटक करण्यात आली होती. तर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात 710 गुन्हे दाखल करून 915 जणांना अटक करण्यात आली होती.

बाल विवाहाचे प्रमाण कमी झाले - आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या (17 जुलै) दिवशी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हणण्यात आले आहे की, बालविवाह प्रकरणांमध्ये कायदेशीर हस्तक्षेप करण्यावर आसाम सरकारने दिलेला भर, आता उर्वरित देशासाठी आदर्श बनला आहे. आसाम सरकारच्या या कायदेशीर धोरणामुळे 2021-22 आणि 2023-224 या वर्षांत राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये बालविवाहात 81 टक्क्यांनी घट झाली आहे.

आपण जिवंत आहोत, तोवर... -याच वर्षाच्या सुरुवातीला हिमंता बिस्वा सरमा यांच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, 1935 रद्द केला. यावरून आसाम विधानसभेत मोठा गदारोळही झाला होता. तेव्हा, याची गरज काय, असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता? यावर, मुख्यमंत्री हिमंता संतप्तपणे म्हणाले होते की, आपण बालविवाहावर बंदी घालणारच. एवढेच नाही, तर आपण जिवंत आहोत, तोवर आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही, असेही सरमा यांनी म्हटले होते.

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाmarriageलग्न