शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

उत्तर प्रदेशात पावसाचे ४० बळी; मृतांची संख्या वाढण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 10:55 IST

जौनपूर येथील सरायखानी गावामध्ये भरतलाल नावाच्या व्यक्तीच्या घरी सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना पावसाच्या तडाख्याने घराची भिंत कोसळून त्याखाली पाच जण दबले गेले.

लखनऊ : उत्तर प्रदेशात गेल्या चोवीस तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ४०  लोक व अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक घरांची पडझड झाली आहे. राज्यात काही ठिकाणी अद्याप मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. पावसामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तींना वाचविण्यासाठी राज्य सरकारने बचावकार्य हाती घेतले आहे. 

जौनपूर येथील सरायखानी गावामध्ये भरतलाल नावाच्या व्यक्तीच्या घरी सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना पावसाच्या तडाख्याने घराची भिंत कोसळून त्याखाली पाच जण दबले गेले. त्यापैकी तीन जण मरण पावले असून, दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुसळधार पावसामुळे अयोध्या रेल्वे स्थानकातही पाणी शिरले आहे. अयोध्या शहराच्या अनेक भागांतही पाणी साचले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे उत्तर प्रदेशात काही भागांमध्ये घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रयागराजमध्येही हीच अवस्था आहे. 

मुसळधार पावसाच्या तडाख्याने काही ठिकाणी पाण्यात बुडून अनेक गुरेढोरे मरण पावली आहेत. बाराबंकी येथे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊसDeathमृत्यू