शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 15:20 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असल्या तरी बुरहान वाणी गँगचे उच्चाटन करण्यात सरकारला यश आले आहे.

नवी दिल्ली- 2014 साली प्रत्येक प्रचारसभेत भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणारे नरेंद्र मोदी आपण सत्तेत येताच दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेऊ असे सांगत असत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची हिंमत होणार नाही असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांचं सरकार येऊन चार वर्षे पूर्ण झाल्यावरही दहशतवादी हल्ले रोखण्यात आपल्याला फारसं यश आलेलं दिसत नाही. सीमेपलिकडून गोळीबार आणि भारताच्या सीमेत दहशतवादी पाठवण्याच्या घटना तशाच असून जम्मू आणि काश्मीरमध्येही फुटिरतावादी तरुणांनी अनेक घातपाती कारवाया केल्या आहेत.अर्थात या काळामध्ये देशातील सुरक्षा दले शांत बसली आहेत असे नाही पण आपल्या जवानांना प्राणांची आहुती देऊन देशाचे रक्षण करावे लागले आहे. 2014 साली निवडणूक प्रचारामध्ये पाकिस्तानला संपुआ सरकारने धडा शिकविण्याऐवजी प्रेमपत्रे पाठवल्यासारखी निषेध खलिते पाठवण्यात धन्यता बाळगली, मी अशी प्रेमपत्रे लिहू शकणार नाही, पाकिस्तानला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल असे नरेंद्र मोदी सांगायचे. जर पंतप्रधानांच्या हातामध्ये देशाच्या सीमा, सीआरपीएफ, सर्व सुरक्षा दले,उपग्रह, मोबाइल नेटवर्क, बँका आहेत मग त्यांना दहशतवादी कारवाया थांबवण्यापासून कोण रोखतंय असे मोदी म्हणायचे पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र दहशतवादावर नियंत्रण आणण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानने भारतावरील हल्ल्यांमध्ये वाढच केली असून जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये अस्थिरताही निर्माण झाली आहे.डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षामध्ये 2022 दहशतवादी मारले गेले तर नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात 1737 दहशतवादी मारले गेले आहेत. संपुआ सरकारच्या शएवटच्या चार वर्षांमध्ये प्रतीवर्ष 505 दहशतवादी मारले गेले पण भाजपाप्रणित रालोआ2 सरकारमध्ये प्रतीवर्ष 434 दहशतवादी मारले गेले आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 177 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते तर मोदी सरकारच्या काळामध्ये या राज्यात 4 वर्षांमध्ये 263 जवान शहिद झाले आहेत.या काळात या राज्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. तसेच नक्षली हल्ल्यांसारख्या हल्ल्यांची संख्या कमी करण्यात मात्र सरकारला यश आल्याने ईशान्य व मध्य भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारल्या जाणाऱ्या जवानांच्या संख्येत घट झाली आहे.2017 साली 860 वेळा, 2016 साली 271 वेळा तसेच 2015 मध्ये 387 आणि 2014मध्ये 405 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाकिस्तानने गोळीबार सुरु केला असून 21 जानेवारीपर्यंत पाकिस्तानने 134 पेक्षा जास्तवेळा शस्त्रशसंधीचे उल्लंघन केले आहे.

बुरहान वाणी गँगचे संपूर्ण उच्चाटनहिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेच्या एकेक कमांडर्सना टिपून मारण्यात मोदी सरकारला यश आले आहे. बुरहान वाणीपासून सुरुवात केल्यावर 10 वरिष्ठ कमांडर्सना मारण्यात भारतीय जवानांना यश आले. यामध्ये सद्दाम पाडर, आदिल खंडे, नासिर पंडित, अश्फाक भट, सब्जार भट, अनिस, इश्फाक डार, वसीम मल्लाह, वसीम शाह यांचा समावेश आहे. बुरहानच्या गँगमधला एकूण एक दहशतवादी मारल्यामुळे मोदी सरकारचे कौतुकही होते.

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरMartyrशहीदCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन