शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

चार महिन्यांत २५ लाख लोकांना मिळाला रोजगार; नोकऱ्या गेल्याने अनेक लोक वळले शेतीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 2:26 AM

याचा अर्थ या काळात यंदा २५ लाख लोकांना रोजगार मिळाला, असा लावला जात आहे. मात्र हे सारे रोजगार कमी कौशल्याचे आहेत, असे सीएमआयईने म्हटले आहे.

नवी दिल्ली : यावर्षीच्या मे ते आॅगस्ट या काळात २५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला व या काळात देशात नोकरी करणाऱ्यांची एकूण संख्या ४0 कोटी ४९ लाखांच्या आसपास होती, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. गेल्या वर्षी याच काळात ४0 कोटी २४ लाख लोक नोकरीमध्ये होते.

याचा अर्थ या काळात यंदा २५ लाख लोकांना रोजगार मिळाला, असा लावला जात आहे. मात्र हे सारे रोजगार कमी कौशल्याचे आहेत, असे सीएमआयईने म्हटले आहे. या संस्थेने म्हटले की, या २५ लाख रोजगारांमुळे आनंद वाटावा, असे मात्र नाही. कारण कमी कौशल्य असणाºयांनाच तो उपलब्ध झाला. या अहवालानुसार उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान (आयटी) व आर्थिक सेवा (फायनान्शिअल सर्व्हिसेस) यांतील रोजगारही कमी झाले आहेत. दुसरीकडे शेती क्षेत्रात अधिक रोजगार मिळाले. शेतीबरोबरच किरकोळ व्यापार (रिटेल ट्रेड), वैयक्तिक स्वरूपाची मोलमजुरीची कामे, (पर्सनल नॉन प्रोफेशनल सर्व्हिसेस) आणि बांधकाम या चार क्षेत्रांत ७0 टक्के लोक कमी कौशल्याचे काम करीत होते.इथे कमी झाल्या नोकऱ्याया सर्व्हेनुसार गेल्या वर्षभरात देशातील उत्पादन क्षेत्रातील ९ लाख रोजगार कमी झाले. वस्त्रोद्योगात तब्बल २२ लाख रोजगार कमी झाले.बांधकामाशी संबंधित सिमेंट, टाइल्स, विटा या उद्योगांतील ४ लाख रोजगार कमी झाले. संघटित उद्योगांतील रोजगार गेल्यामुळे अकुशल वा कमी कौशल्य असलेल्या लोकांना पुन्हा शेतीकडे वळावे लागले.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी