शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मोदी सरकारचे शेतकऱ्यांसाठी ४ महत्त्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 05:41 IST

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे प्रतिपादन; निर्णय भविष्यात इतिहास बनतील

नवी दिल्ली : देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकºयाच्या दारी समृद्धी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चार मोठे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय भविष्यात इतिहास बनतील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.

तोमर यांनी सांगितले की, या चार निर्णयांनुसार, शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कार्यकाल वाढविण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पिकांच्या आधारभूत किमती वाढविण्यात आल्या आहेत. एक बाजार एक देश आणि बाजार समित्यांशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.तोमर यांनी म्हटले की, कृषी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (संवर्धन व सुलभीकरण) अध्यादेश २0२0 आणि शेतकरी सशक्तीकरण व संरक्षण अध्यादेश २0२0 असे दोन अध्यादेश सरकारने जारी केले आहेत. पहिल्या अध्यादेशामुळे शेतकरी आता आपली उत्पादने देशात कोठेही विकूशकतील.दुसºया अध्यादेशानुसार, शेतकरी आणि प्रायोजक यांच्यात करार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी उभ्या पिकाचा विक्री करार करू शकेल. अशा करारांमुळे बाजारातील जोखीम शेतकºयांऐवजी प्रायोजकाच्या डोक्यावर जाईल.अल्पकालीन कर्ज परतफेडीची मुदत वाढलीच्अल्पकालीन कृषी कर्जांची परतफेडीची कालमर्यादा ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जून रोजी घेतला. कोरोनाबाधित शेतकºयांसाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल.च्याशिवाय खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत सरकारने ५0 ते ८३ टक्के वाढ केली आहे. या दोन्ही निर्णयांमुळे शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.च्तोमर यांनी म्हटले की, व्याज सवलत योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकºयांना बँकांच्या माध्यमातून कर्जात २ टक्के सूट देत आहे. वेळेत परतफेड करणाºया शेतकºयांना अतिरिक्त ३ टक्के लाभ दिला जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार