शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

‘५जी’मुळे ‘दूरसंचार’चे महत्त्व आणखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 2:06 AM

‘५जी’च्या आगमनामुळे दूरसंचार क्षेत्राची इतर प्रमुख क्षेत्रांसोबतची ही जोडणी (कनेक्ट) आणखी मजबूत होईल, असे दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनी सांगितले.

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्राचा आर्थिक वृद्धी आणि रोजगार यावर थेट परिणाम होत असतो. त्याचबरोबर आरोग्य व कृषी यांसारख्या प्रमुख क्षेत्रांसाठी दूरसंचार क्षेत्र महत्त्वाचे आहे. ‘५जी’च्या आगमनामुळे दूरसंचार क्षेत्राची इतर प्रमुख क्षेत्रांसोबतची ही जोडणी (कनेक्ट) आणखी मजबूत होईल, असे दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनी सोमवारी सांगितले.येथे ‘आसियान-ट्राय’ कार्यक्रमात अंशू प्रकाश म्हणाले की, नागरिकांचे सबलीकरण करणे, प्रशासन अधिक गतिमान करणे आणि पारदर्शकतेत वाढ करणे यात दूरसंचार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. हे एक प्रमुख पायाभूत क्षेत्र आहे. त्याचा आर्थिक वृद्धी व रोजगारावर थेट परिणाम होत असतो. कारण इतर क्षेत्रे दूरसंचार क्षेत्रावरच स्वार होऊन काम करीत असतात. वित्त, कृषी, आरोग्यसेवा आणि इतरही अनेक क्षेत्रांसाठी ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी’ हा एक अविभाज्य भाग आहे. ‘५जी’च्या आगमनानंतर ही कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.दूरसंचार नियामक ‘ट्राय’चे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, माहिती व दळवळण तंत्रज्ञान क्षेत्रात यंत्रणा व डाटासुरक्षा अधिक महत्त्वाची होत चालली आहे. अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्र दूरसंचार क्षेत्रावर अवलंबून आहे. या क्षेत्राची कमजोरी (व्हल्नरेबिलिटी) इतर क्षेत्रांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.