शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

आसाममध्ये मुसळधार पावसाचे ३६ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:28 IST

आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात पुराचे पाणी आता ओसरले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात पुराचे पाणी आता ओसरले आहे. मात्र या राज्यातील ३३ पैकी २८ जिल्ह्यांतील सुमारे ५४ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांची संख्या ३६वर पोहोचली आहे.काझीरंगा व पोबितोरा येथील अभयारण्यांतील एकशिंगी गेंडे व अन्य प्राणी मोठ्या संख्येने ब्रह्मपुत्रा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडले आहे. या नदीने राज्यातील गुवाहाटी व अन्य ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे की, मोरीगावमध्ये पुरामुळे तीन, विश्वनाथमध्ये दोन, सोनितपूर, उदलगुरी, बोंगाईगाव, बारपेटा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. बारपेटामध्ये १३.४८ लाख लोकांना पुराचा फटका बसला असून तेथील चार हजार घरांचे नुकसान झाले आहे. १३० प्राणी वाहून गेले असून त्याशिवाय लहान, मोठ्या २५ लाख प्राण्यांना व पोल्ट्रीतील कोंबड्या आदी २५ लाख पक्ष्यांना पुराचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यात २.२६ लाख लोकांनी घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. पूरग्रस्तांसाठी ६८९ निवारा शिबीरे उघडण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील मंगळुरू रेल्वे स्थानकात बुधवारपासून गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा स्थितीतही रेल्वेवाहतूकीवर फारसा परिणाम झालेला नाही. मंगळुरू मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागात पाणी साचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (वृत्तसंस्था)