शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आसाममध्ये मुसळधार पावसाचे ३६ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:28 IST

आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात पुराचे पाणी आता ओसरले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात पुराचे पाणी आता ओसरले आहे. मात्र या राज्यातील ३३ पैकी २८ जिल्ह्यांतील सुमारे ५४ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांची संख्या ३६वर पोहोचली आहे.काझीरंगा व पोबितोरा येथील अभयारण्यांतील एकशिंगी गेंडे व अन्य प्राणी मोठ्या संख्येने ब्रह्मपुत्रा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडले आहे. या नदीने राज्यातील गुवाहाटी व अन्य ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे की, मोरीगावमध्ये पुरामुळे तीन, विश्वनाथमध्ये दोन, सोनितपूर, उदलगुरी, बोंगाईगाव, बारपेटा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. बारपेटामध्ये १३.४८ लाख लोकांना पुराचा फटका बसला असून तेथील चार हजार घरांचे नुकसान झाले आहे. १३० प्राणी वाहून गेले असून त्याशिवाय लहान, मोठ्या २५ लाख प्राण्यांना व पोल्ट्रीतील कोंबड्या आदी २५ लाख पक्ष्यांना पुराचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यात २.२६ लाख लोकांनी घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. पूरग्रस्तांसाठी ६८९ निवारा शिबीरे उघडण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील मंगळुरू रेल्वे स्थानकात बुधवारपासून गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा स्थितीतही रेल्वेवाहतूकीवर फारसा परिणाम झालेला नाही. मंगळुरू मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागात पाणी साचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (वृत्तसंस्था)