शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 8:18 AM

राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेत ही घटना घडली.

ठळक मुद्देराजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा.राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेतील घटना.उपचारासाठी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जयपूर - राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेत ही घटना घडली. मंगळवारी (13 ऑगस्ट) मुलांना मध्यान्ह भोजनात कढी-भात देण्यात आला होता. मात्र तो खाल्ल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जाबरकिया खेड्यातील एका सरकारी माध्यामिक शाळेतील 36 मुलांना विषबाधा झाली आहे. मध्यान्ह भोजनात देण्यात आलेला कढी-भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या सुरू झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. गंगापूर येथील सरकारी रुग्णालयात मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुलांना दूषित कढी भात दिला गेला असा आरोप करण्यात आल्याची  माहिती करोई पोलीस ठाण्याचे प्रभारी मुकेश कुमार वर्मा यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाची अधिक चौकशी करून दोषींवर कारवाई लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानSchoolशाळाfood poisoningअन्नातून विषबाधाhospitalहॉस्पिटल