शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

१९१ वर्षापूर्वी मजूर बनून ३६ बिहारी मॉरिशसला गेले, तिथं कसा वसवला देश? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:16 IST

ब्रिटीश सरकारने भारतीय मजुरांना ५ वर्ष नोकरी देण्याचं आश्वासन देत मॉरिशसला पाठवले. पुरुषांसाठी ५ रूपये आणि महिलांसाठी ४ रूपये महिना पगार दिला जात होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय मॉरिशस दौऱ्यावर गेले आहेत. आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे आहेत. ११ मार्चला जेव्हा पंतप्रधान मोदी मॉरिशसला पोहचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक मॉरिशस महिलांनी बिहारी 'गीत गवई' गायली. बिहारी गीत केवळ गाणे नाही तर ती मॉरिशसी परंपरा आहे कारण १९१ वर्षापूर्वी भारतातून गेलेल्या ३६ बिहारी मजुरांनी मॉरिशस देश वसवल्याचा इतिहास आहे.

काय आहे इतिहास?

१८ व्या शतकाची ही गोष्ट आहे, भारतात दुष्काळ आणि भूकबळीनं जवळपास ३ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नुकतेच ब्रिटिशांनी भारतावर पकड मजबूत करायला सुरूवात केली होती. ब्रिटीश सरकारने त्याचा फायदा घेत यातून एक मार्ग काढला जो द ग्रेट एक्सपेरिमेंट नावानं ओळखला जातो. या अंतर्गत मजुरांना कर्जाच्या बदल्यात काम करण्याची ऑफर दिली. म्हणजेच जर एखाद्या मजुरावर कर्ज असेल आणि त्याला ते फेडता येत नसेल तर त्याने इंग्रजांची गुलामी करायची. त्यासाठी एक ठराविक कालावधी निश्चित केला. गुलामीच्या बदल्यात मजुरांची कर्जातून मुक्तता व्हायची. 

त्याकाळी इंग्रजांना चहा आणि कॉफीची सवय लागली ज्यात साखरेचा वापर होत असे. त्यावेळी साखरेचे उत्पादन कॅरिबियन आयलँड म्हणजे मॉरिशस आणि आसपासच्या बेटांवर व्हायचे. त्यामुळे ब्रिटिशांनी कॅरिबियन बेटांवर ऊसाची शेती वाढवली ज्यासाठी भारतीय मजुरांना मॉरिशसला आणलं गेले. १० सप्टेंबर १८३४ साली कोलकाताहून एटलस नावाच्या जहाजातून ३६ बिहारी मजूर मॉरिशसला गेले. ५३ दिवसांच्या प्रवासानंतर हे मजूर २ नोव्हेंबर २८३४ साली जहाजातून मॉरिशसला पोहचले. 

मॉरिशसमध्ये भारतीय लोकसंख्या वाढली कशी?

ब्रिटीश सरकारने भारतीय मजुरांना ५ वर्ष नोकरी देण्याचं आश्वासन देत मॉरिशसला पाठवले. पुरुषांसाठी ५ रूपये आणि महिलांसाठी ४ रूपये महिना पगार दिला जात होता. मॉरिशसला पाठवण्यापूर्वी त्यांच्याकडून करार करून घेण्यात आला त्याला भारतीय गिरमिट म्हटलं जाते. हा करार ब्रिटीश अधिकारी जॉर्ज चार्ल्स याने बनवला होता. ३६ मजूर मॉरिशसला गेल्यानंतर वर्षोनुवर्षे हा सिलसिला सुरू होता. १८३४ ते १९१० या काळात ४.५ लाख मजूर भारतातून मॉरिशसला पाठवले गेले. भारतीय मजूर तिथे काम करत स्थायिक झाले. त्यांच्या पुढील पिढीने मॉरिशसला त्यांचा देश मानला. ५ वर्षाच्या करारामुळे मजूर कालावधी संपण्याआधी पुन्हा भारतात येऊ शकत नव्हते. १९ व्या शतकात साखरेचे उत्पादन जवळपास सर्वच देशात सुरू झाले. त्यानंतर औद्योगिक क्रांती आली आणि लोक त्यांच्या हक्कासाठी लढू लागले. 

१९३१ साली मॉरिशसमध्ये ६८ टक्के लोकसंख्या भारतीय होती. याठिकाणी मजुरीसाठी आलेल्या कुटुंबात रामगुलाम कुटुंबही होते ज्यांनी मॉरिशसला इंग्रजी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी भारतीय परंपरा, विशेषत: भोजपुरी भाषा आणि हिंदू धर्माला प्रोत्साहन दिले. १९३५ साली मोहित रामगुलाम यांचे चिरंजीव शिवसागर रामगुलाम इंग्लंडहून शिक्षण घेऊन मॉरिशसला परतले. त्यांनी मॉरिशसमधील मजुरांचा अधिकार आणि मतदानाचा हक्क यासाठी संघर्ष सुरू केले. १९६८ साली जेव्हा मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा शिवसागर रामगुलाम हे मॉरिशसचे राष्ट्रपिता आणि पहिले पंतप्रधान बनले.     

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी