शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

१९१ वर्षापूर्वी मजूर बनून ३६ बिहारी मॉरिशसला गेले, तिथं कसा वसवला देश? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:16 IST

ब्रिटीश सरकारने भारतीय मजुरांना ५ वर्ष नोकरी देण्याचं आश्वासन देत मॉरिशसला पाठवले. पुरुषांसाठी ५ रूपये आणि महिलांसाठी ४ रूपये महिना पगार दिला जात होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय मॉरिशस दौऱ्यावर गेले आहेत. आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे आहेत. ११ मार्चला जेव्हा पंतप्रधान मोदी मॉरिशसला पोहचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक मॉरिशस महिलांनी बिहारी 'गीत गवई' गायली. बिहारी गीत केवळ गाणे नाही तर ती मॉरिशसी परंपरा आहे कारण १९१ वर्षापूर्वी भारतातून गेलेल्या ३६ बिहारी मजुरांनी मॉरिशस देश वसवल्याचा इतिहास आहे.

काय आहे इतिहास?

१८ व्या शतकाची ही गोष्ट आहे, भारतात दुष्काळ आणि भूकबळीनं जवळपास ३ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नुकतेच ब्रिटिशांनी भारतावर पकड मजबूत करायला सुरूवात केली होती. ब्रिटीश सरकारने त्याचा फायदा घेत यातून एक मार्ग काढला जो द ग्रेट एक्सपेरिमेंट नावानं ओळखला जातो. या अंतर्गत मजुरांना कर्जाच्या बदल्यात काम करण्याची ऑफर दिली. म्हणजेच जर एखाद्या मजुरावर कर्ज असेल आणि त्याला ते फेडता येत नसेल तर त्याने इंग्रजांची गुलामी करायची. त्यासाठी एक ठराविक कालावधी निश्चित केला. गुलामीच्या बदल्यात मजुरांची कर्जातून मुक्तता व्हायची. 

त्याकाळी इंग्रजांना चहा आणि कॉफीची सवय लागली ज्यात साखरेचा वापर होत असे. त्यावेळी साखरेचे उत्पादन कॅरिबियन आयलँड म्हणजे मॉरिशस आणि आसपासच्या बेटांवर व्हायचे. त्यामुळे ब्रिटिशांनी कॅरिबियन बेटांवर ऊसाची शेती वाढवली ज्यासाठी भारतीय मजुरांना मॉरिशसला आणलं गेले. १० सप्टेंबर १८३४ साली कोलकाताहून एटलस नावाच्या जहाजातून ३६ बिहारी मजूर मॉरिशसला गेले. ५३ दिवसांच्या प्रवासानंतर हे मजूर २ नोव्हेंबर २८३४ साली जहाजातून मॉरिशसला पोहचले. 

मॉरिशसमध्ये भारतीय लोकसंख्या वाढली कशी?

ब्रिटीश सरकारने भारतीय मजुरांना ५ वर्ष नोकरी देण्याचं आश्वासन देत मॉरिशसला पाठवले. पुरुषांसाठी ५ रूपये आणि महिलांसाठी ४ रूपये महिना पगार दिला जात होता. मॉरिशसला पाठवण्यापूर्वी त्यांच्याकडून करार करून घेण्यात आला त्याला भारतीय गिरमिट म्हटलं जाते. हा करार ब्रिटीश अधिकारी जॉर्ज चार्ल्स याने बनवला होता. ३६ मजूर मॉरिशसला गेल्यानंतर वर्षोनुवर्षे हा सिलसिला सुरू होता. १८३४ ते १९१० या काळात ४.५ लाख मजूर भारतातून मॉरिशसला पाठवले गेले. भारतीय मजूर तिथे काम करत स्थायिक झाले. त्यांच्या पुढील पिढीने मॉरिशसला त्यांचा देश मानला. ५ वर्षाच्या करारामुळे मजूर कालावधी संपण्याआधी पुन्हा भारतात येऊ शकत नव्हते. १९ व्या शतकात साखरेचे उत्पादन जवळपास सर्वच देशात सुरू झाले. त्यानंतर औद्योगिक क्रांती आली आणि लोक त्यांच्या हक्कासाठी लढू लागले. 

१९३१ साली मॉरिशसमध्ये ६८ टक्के लोकसंख्या भारतीय होती. याठिकाणी मजुरीसाठी आलेल्या कुटुंबात रामगुलाम कुटुंबही होते ज्यांनी मॉरिशसला इंग्रजी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी भारतीय परंपरा, विशेषत: भोजपुरी भाषा आणि हिंदू धर्माला प्रोत्साहन दिले. १९३५ साली मोहित रामगुलाम यांचे चिरंजीव शिवसागर रामगुलाम इंग्लंडहून शिक्षण घेऊन मॉरिशसला परतले. त्यांनी मॉरिशसमधील मजुरांचा अधिकार आणि मतदानाचा हक्क यासाठी संघर्ष सुरू केले. १९६८ साली जेव्हा मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा शिवसागर रामगुलाम हे मॉरिशसचे राष्ट्रपिता आणि पहिले पंतप्रधान बनले.     

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी