शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

धक्कादायक! 2017 मध्ये लग्नासाठी 3,400 नवरदेवांचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 1:29 PM

जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी एका वर्षात तब्बल 3,400 युवकांच अपहरण करण्यात आलं. 2017 या वर्षातील ही अधिकृत आकडेवारी आहे.

पाटणा - लग्नासाठी मुलगी तयार होत नसेल तर मुल मुलीला पळवून आणतात. पण बिहारमध्ये बिलकुल याउलट घडलं आहे. बिहारमध्ये जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी एका वर्षात तब्बल 3,400 युवकांच अपहरण करण्यात आलं. 2017 या वर्षातील ही अधिकृत आकडेवारी आहे. अशा प्रकारच्या लग्नाला बिहारमध्ये पाकदुआ विवाह म्हटले जाते. जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी 3405 युवकांचे अपहरण करण्यात आले. 

बंदुकीच्या धाकावर किंवा धमकी देऊन हे विवाह लावण्यात आले अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली. मागच्या महिन्यात पाटण्यामध्ये बंदुकीच्या धाकावर एका इंजिनिअरचे अपहरण करुन त्याचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते. त्या घटनेला राष्ट्रीय स्तरावर ठळकपणे प्रसिद्धी मिळाली होती. 

2016 मध्ये पाकदुआ विवाहासाठी 3070, 2015 मध्ये तीन हजार आणि 2014 मध्ये 2,526 युवकांचे अपहरण करण्यात आले. या विवाहांमध्ये युवक आणि त्याच्या कुटुंबियांना धाक दाखवून लग्नाला भाग पाडण्यात आले अशी माहिती पोलीस  अधिका-याने दिली.  पोलिसांच्या रेकॉर्डनुसार बिहारमध्ये दरदिवशी नऊ विवाह जबरदस्तीने लावले जातात.  

काय घडलं विनोद कुमारच्या बाबतीत

बंदुकीच्या धाकावर 29 वर्षीय इंजिनिअर विनोद कुमारचे अपहरण करुन त्याला लग्नासाठी थेट विवाहाच्या मांडवात आणण्यात आले. बिहारमधील पाटणा येथील पांडाराक भागात ही धक्कादायक घटना घडली. विनोद कुमार असे पीडित इंजिनिअरचे नाव असून तो बोकारो स्टील प्लांटमध्ये ज्यूनियर इंजिनिअर पदावर नोकरीला आहे. 

अपहरण केल्यानंतर विनोद कुमारला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने विवाहासाठी मांडवात बसवण्यात आले. ही जबरदस्ती सुरु असताना विनोद कुमार अक्षरक्ष: रडून मदतीसाठी याचना करत होता. पण मुलीकडच्या बाजूच्या महिला लग्नाच्या विधीमध्ये त्याने सहकार्य करावे यासाठी विनोद कुमारची समजूत घालत होत्या.  एका कॉमन मित्राच्या लग्नामध्ये आपली वधूपक्षाकडच्या एका नातेवाईकाबरोबर ओळख झाली तिथे त्या नातेवाईकाने आपल्या डोक्याला बंदुक लावली व लग्नाला भाग पाडले असा आरोप विनोद कुमारने केला.