शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

भाजपने दिला ३३ टक्के खासदारांना नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:04 IST

काही स्वेच्छेने, तर काही वयोमानामुळे दूर

नवी दिल्ली : बंडखोरी होण्याचा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाने या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास ३३ टक्के विद्यमान खासदारांना नारळ दिला आहे. शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेऊन, ज्यांची कामगिरी चांगली नाही वा ज्यांच्या विद्यमान कारकिर्दीबाबत नाराजी आहे, अशा विद्यमान खासदारांना भाजपने या निवडणुकीमध्ये पुन्हा तिकीट दिलेले नाही. भाजप ४३७ जागा लढविणार असून, आजअखेर ४१७ उमेदवारांच्या १९ याद्या घोषित करण्यात आल्या आहेत. अद्याप २0 जागांची घोषणा बाकी असून, आतापर्यंत ८२ विद्यमान खासदार घरी बसवले आहेत. पक्ष आणखी कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ४३७ जागा लढविणार असून, उर्वरित जागा या राष्टÑीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांसाठी सोडल्या आहेत. सन २०१४च्या मोदी लाटेमध्ये निवडून आलेल्यांपैकी ज्यांची कामगिरी चांगली नाही अथवा ज्यांना नाराजीचा फटका बसू शकतो, अशा खासदारांना यंदा तिकिटे न देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. यामध्ये स्वेच्छेने न लढण्याचा निर्णय घेतलेल्या नेत्यांसोबतच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या खासदारांचाही समावेश आहे. सोळाव्या लोकसभेत ५४३ निवडून देण्यात येणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे २६८ सदस्य आहेत.

दिल्लीतील सर्व सात जागा, १३ पैकी तीन जागा पंजाबमधील, चंदीगढमधील एक, राजस्थानमधील ९ आणि हरयाणामधील दोन विद्यमान खासदारांचा पत्ता नव्या यादीत कापण्यात आला आहे.ज्या खासदारांची कामगिरी चांगली झालेली नाही अथवा ज्यांचे प्रस्थापितत्व हे त्यांच्या विरोधातील नाराजीचे कारण बनू शकते, अशा खासदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने आणि मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे डावलले गेलेले तसेच त्यांचे समर्थक यांच्या बंडखोरीचा धोका लक्षात घेऊनही हा निर्णय पक्षाने घेतला आहे.

पक्षाध्यक्ष अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा निश्चित अंदाज असल्याने त्यांनी हा कठीण निर्णय घेतला आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या बंडखोरीचा बंदोबस्त कसा करावयाचा याचीही त्यांनी व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे पक्षशिस्त ही महत्वाची असल्याचा संदेशही ते सर्वांना देऊ इच्छितात. उर्वरित याद्यांमध्येही काही जणांचा पत्ता कापला गेल्यास सुमारे ५0 टक्के नवोदितांना भाजपाकडून उमेदवारीची संधी मिळेल. येत्या ४८ तासात हरयाणा, पंजाब आणि दिल्लीतील आणखी उमेदवार जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.

वयोवृद्धांना संधी नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये न उतरविण्याचा घेतलेला निर्णयही अनेक खासदारांना संधी नाकारणारा ठरला आहे. यामुळे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसेच लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजनयांना यंदा पक्षाने तिकिट दिलेले नाही.अन्य कारणांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात नसलेल्या विद्यमान खासदारांमध्ये किरीट सोमय्यांचाही समावेश आहे. स्वेच्छेने ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेणाºयांमध्ये उमा भारती, सुषमा स्वराज या खासदारांचाही समावेश आहे.

राज्यात सात नवे चेहरेभाजपने राज्यातील सात विद्यमान खासदारांना यंदा तिकीट नाकारले आहे. त्यात जायंट किलर ठरलेले सोलापूरचे शरद बनसोडे, सलग तीन टर्म खासदारकी करणारे दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण आणि किरीट सोमैय्या हे प्रमुख आहेत. याशिवाय दिलीप गांधी ( नगर), ए. टी. पाटील (जळगाव), अनिल शिरोळे (पुणे), सुनील गायकवाड (लातूर) हेही यंदा निवडणूक लढविणार नाहीत.दिल्लीत सर्वच जागांवर नवे चेहरेच्भाजपने दिल्लीत सर्वच्या सर्व सातही जागांवर विद्यमान खासदारांऐवजी नव्या चेहºयांना संधी दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत मोठी शस्त्रक्रिया केली आहे.च्गेल्या तीन लोकसभेत खासदार असणाºया मीनाक्षी लेखी, उदित राज, महेश गिरी यांना तिकिट दिले जाणार नाही. छत्तीसगढमध्येही भाजपने सर्व ११ जागांपैकी १0 विद्यमान खासदारांना घरी बसविले आहे.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक