शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

दलित अत्याचारप्रकरणी ३३ जण ठरले दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:10 IST

हरयाणातल्या हिसार जिल्ह्यातील मिर्चपूर येथे ६० वर्षांच्या वृद्ध दलित आणि त्याच्या अपंग मुलीला जीवंत जाळल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने एकूण ३३ जणांना दोषी ठरविले असून,

नवी दिल्ली : हरयाणातल्या हिसार जिल्ह्यातील मिर्चपूर येथे ६० वर्षांच्या वृद्ध दलित आणि त्याच्या अपंग मुलीला जीवंत जाळल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने एकूण ३३ जणांना दोषी ठरविले असून, त्यातील १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एप्रिल २०१०मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा न्या. एस. मुरलीधर व न्या. आय. एस. मेहता यांच्या खंडपीठाने निकाल दिला.

दिल्ली हायकोर्ट; १२ जणांना जन्मठेप

देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली, तरी दलितांवरील अत्याचार थांबायला तयार नाहीत. आपल्या समाजात समता व बंधुता यांचा अभाव आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना म्हटले होते. त्याची आठवण उच्च न्यायालयाने निकालपत्रात करुन दिली. मिर्चपूर येथे जाट समुदायाच्या लोकांकडून वाल्मिकी समाजातील लोकांच्या घरांवर जाणूनबुजून हल्ले चढविले गेले, असेही न्यायालयाने म्हटले. दोषींकडून जो दंड वसूल केला जाईल त्याची रक्कम मिर्चपूर प्रकरणात बळी पडलेल्यांच्या वारसदारांना किंवा अन्य जखमी लोकांना भरपाई म्हणून दिली जाईल. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षणCourtन्यायालय