शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 02:45 IST

सीआरपीएफच्या महासंचालकांनी सांगितले की, २१ एप्रिलपासूनच्या २१ दिवसांच्या कारवाईत ३१ माओवादी मारले गेले. त्यापैकी २८ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. 

बिजापूर (छत्तीसगड): छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा टेकड्यांभोवती असलेल्या घनदाट जंगलातील व्यापक कारवाईत केंद्रीय व राज्य सुरक्षा दलांनी मागील २१ दिवसांत ३१ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवले.

सीआरपीएफच्या महासंचालकांनी सांगितले की, २१ एप्रिलपासूनच्या २१ दिवसांच्या कारवाईत ३१ माओवादी मारले गेले. त्यापैकी २८ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. 

ही तर शेवटाची सुरुवात!

या पहाडीवरील मोहिमेबाबत १४ मे रोजी छत्तीसगडचे पोलिस महासंचालक अरुण देव गौतम व राज्य राखीव दलाचे पोलिस महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. माओवाद्यांच्या बटालियन क्र. १ चा कमांडर व जहाल नेता वासे हिडमा, देवा, दामोदर, आझाद व सुजाता यांचे हे आश्रयस्थान मानले जाते. कठीण भूभागामुळे सर्व मृतदेह बाहेर काढता आलेले नाहीत किंवा जखमींना अटक करता आली नाही. मोठा दारूगोळा, डिटोनेटर, वैद्यकीय साहित्य, विद्युत उपकरणे, नक्षली साहित्य असे १२०० किलोचे साहित्य जप्त करण्यात आले. दीडशेवर बंकर नष्ट करून सुरक्षा दलाने माओवाद्यांना मोठा हादरा दिला. 

नक्षलविरोधी कारवाईत ऐतिहासिक यश : शाह

नवी दिल्ली : छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर ३१ नक्षलवाद्यांना ठार करून सुरक्षा दलांनी देशाच्या नक्षलमुक्तीच्या संकल्पात ऐतिहासिक यश मिळवले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. ही कारवाई  २१ दिवसांत पूर्ण केली आणि सुरक्षा दलांतील एकही बळी गेला नाही, याचा मला खूप आनंद आहे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीAmit Shahअमित शाहChhattisgarhछत्तीसगडTelanganaतेलंगणा