शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र-तेलंगणात पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू, ४३२ रेल्वे गाड्या रद्द; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 12:12 IST

Andhra Pradesh, Telangana Rain : दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला. 

Andhra Pradesh, Telangana Rain : हैदराबाद/विजयवाडा : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रस्ते, रेल्वे मार्ग या वाहतुकीच्या साधनांचेही नुकसान झाले आहे. हजारो एकर शेतजमीन पाण्यात बुडाली असून बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला. 

तेलंगणामध्ये १६ आणि आंध्र प्रदेशात १५ जणांचा पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला. तेलंगणातील समुद्रमजवळ रेल्वे रुळाखालील खडीचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला. आंध्र प्रदेशात जवळपास साडेचार लाख लोकांना याचा फटका बसला आहे. विजयवाडामध्ये दुधासह जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये एनटीआर, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पलानाडू, बापटला आणि प्रकाशम यांचा समावेश आहे, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफच्या २० टीम आणि एनडीआरएफच्या १९ टीम कार्यरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक भागांत २४ तासांहून अधिक काळ वीज खंडित झाल्यामुळे विजयवाड्यात जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. 

पुरामुळे इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोन सेवा विस्कळीत झाली आहे. हैदराबादमधील कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला. विजयवाडा शहर आणि आसपासच्या भागात वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रकाशम बॅराजमधून ११.३ लाख क्युसेक पुराचे पाणी सोडण्यात आले.

तेलंगणात १६ जणांचा मृत्यूयाशिवाय, तेलंगणामध्ये पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने सोमवारी सुरुवातीला ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. राज्य सरकारने केंद्राकडे तात्काळ दोन हजार कोटी रुपयांची मदत मागितली. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाधित भागांना भेटी देऊन पूर ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. 

पिकांचेही मोठे नुकसानराज्याचे आयटी आणि उद्योग मंत्री डी. श्रीधर बाबू म्हणाले की, नुकसानीचा अहवाल आल्यानंतरच संपूर्ण माहिती कळू शकेल. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वसमावेशक अहवाल सरकार केंद्राला सादर करेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार दीड लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. खम्ममच्या पूरग्रस्त भागात घरातील साहित्य वाहून गेल्याची दृश्ये समोर आली आहेत. 

४३२ रेल्वे गाड्या रद्ददक्षिण मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने ४३२ गाड्या रद्द करण्यात आल्या तर १३ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. सोमवारी दुपारपर्यंत १३९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही राज्यांतील संततधार पावसामुळे काझीपेठ-विजयवाडा विभागात पूर आणि दरड कोसळली असून पाच गाड्या अडकून पडल्या आहेत. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाRainपाऊस