शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

आंध्र-तेलंगणात पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू, ४३२ रेल्वे गाड्या रद्द; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 12:12 IST

Andhra Pradesh, Telangana Rain : दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला. 

Andhra Pradesh, Telangana Rain : हैदराबाद/विजयवाडा : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रस्ते, रेल्वे मार्ग या वाहतुकीच्या साधनांचेही नुकसान झाले आहे. हजारो एकर शेतजमीन पाण्यात बुडाली असून बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला. 

तेलंगणामध्ये १६ आणि आंध्र प्रदेशात १५ जणांचा पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला. तेलंगणातील समुद्रमजवळ रेल्वे रुळाखालील खडीचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला. आंध्र प्रदेशात जवळपास साडेचार लाख लोकांना याचा फटका बसला आहे. विजयवाडामध्ये दुधासह जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये एनटीआर, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पलानाडू, बापटला आणि प्रकाशम यांचा समावेश आहे, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफच्या २० टीम आणि एनडीआरएफच्या १९ टीम कार्यरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक भागांत २४ तासांहून अधिक काळ वीज खंडित झाल्यामुळे विजयवाड्यात जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. 

पुरामुळे इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोन सेवा विस्कळीत झाली आहे. हैदराबादमधील कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला. विजयवाडा शहर आणि आसपासच्या भागात वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रकाशम बॅराजमधून ११.३ लाख क्युसेक पुराचे पाणी सोडण्यात आले.

तेलंगणात १६ जणांचा मृत्यूयाशिवाय, तेलंगणामध्ये पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने सोमवारी सुरुवातीला ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. राज्य सरकारने केंद्राकडे तात्काळ दोन हजार कोटी रुपयांची मदत मागितली. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाधित भागांना भेटी देऊन पूर ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. 

पिकांचेही मोठे नुकसानराज्याचे आयटी आणि उद्योग मंत्री डी. श्रीधर बाबू म्हणाले की, नुकसानीचा अहवाल आल्यानंतरच संपूर्ण माहिती कळू शकेल. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वसमावेशक अहवाल सरकार केंद्राला सादर करेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार दीड लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. खम्ममच्या पूरग्रस्त भागात घरातील साहित्य वाहून गेल्याची दृश्ये समोर आली आहेत. 

४३२ रेल्वे गाड्या रद्ददक्षिण मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने ४३२ गाड्या रद्द करण्यात आल्या तर १३ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. सोमवारी दुपारपर्यंत १३९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही राज्यांतील संततधार पावसामुळे काझीपेठ-विजयवाडा विभागात पूर आणि दरड कोसळली असून पाच गाड्या अडकून पडल्या आहेत. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाRainपाऊस