शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मध्य प्रदेशात काँग्रेससाठी या 30 जागा ठरणार निर्णायक, भाजपाच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 17:52 IST

मध्य प्रदेश विधानसभेची निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघातील समीरकणांची आकडेमोड सुरू आहे.  

भोपाळ - यावेळी मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघातील समीकरणांची आकडेमोड करून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत झालेल्या आणि 2500 हून कमी मतांनी जय पराजयाचा निर्णय झालेल्या 30 जागांवर दोन्ही पक्षांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

या 30 जागांवर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा अगदी काठावरच्या मताधिक्याने विजय झाला होता. दरम्यान, यावेळी काँग्रेसने भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमधील गेल्या दोन निवडणुकांमधील निकाल पाहिल्यास काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मात्र त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या जागा आणि मते दोन्हींमध्ये वाढ झालेली दिसत आहे.  2008 साली काँग्रेसने मध्य प्रदेशात 71 जागा जिंकल्या होत्या. मात्र 2013 मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढूनही काँग्रेसच्या जागा घटल्या होत्या. 

 ज्या 30 मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या 30 उमेदवारांना 2 हजार 500 हून कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता, अशा मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेसने तिकीट वाटप करताना विशेष लक्ष दिले होते. तसेच येथील जातीय समीकरणेही विचारात घेण्यात आली आहेत. 

या 30 जागांपैकी 11 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा केवळ 1 हजारहून कमी मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे अशा जागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. दुसरीकडे गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने आपल्या मतांच्या टक्केवारीबरोबरच जागांची संख्याही वाढवली आहे. 2008 साली भाजपाला 143 जागा मिळाल्या होत्या. तर 2013 साली भाजपाने 165 जागांपर्यंत मुसंडी मारली होती. विशेष बाब म्हणजे सहा मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा 1 हजारहून कमी मतांनी पराभव झाला होता. सध्या भाजपा नेत्यांनी पाच हजारहून कमी मताधिक्याने पराभव झालेल्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहेत.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपा