शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

मध्य प्रदेशात काँग्रेससाठी या 30 जागा ठरणार निर्णायक, भाजपाच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 17:52 IST

मध्य प्रदेश विधानसभेची निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघातील समीरकणांची आकडेमोड सुरू आहे.  

भोपाळ - यावेळी मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघातील समीकरणांची आकडेमोड करून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत झालेल्या आणि 2500 हून कमी मतांनी जय पराजयाचा निर्णय झालेल्या 30 जागांवर दोन्ही पक्षांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

या 30 जागांवर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा अगदी काठावरच्या मताधिक्याने विजय झाला होता. दरम्यान, यावेळी काँग्रेसने भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमधील गेल्या दोन निवडणुकांमधील निकाल पाहिल्यास काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मात्र त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या जागा आणि मते दोन्हींमध्ये वाढ झालेली दिसत आहे.  2008 साली काँग्रेसने मध्य प्रदेशात 71 जागा जिंकल्या होत्या. मात्र 2013 मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढूनही काँग्रेसच्या जागा घटल्या होत्या. 

 ज्या 30 मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या 30 उमेदवारांना 2 हजार 500 हून कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता, अशा मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेसने तिकीट वाटप करताना विशेष लक्ष दिले होते. तसेच येथील जातीय समीकरणेही विचारात घेण्यात आली आहेत. 

या 30 जागांपैकी 11 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा केवळ 1 हजारहून कमी मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे अशा जागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. दुसरीकडे गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने आपल्या मतांच्या टक्केवारीबरोबरच जागांची संख्याही वाढवली आहे. 2008 साली भाजपाला 143 जागा मिळाल्या होत्या. तर 2013 साली भाजपाने 165 जागांपर्यंत मुसंडी मारली होती. विशेष बाब म्हणजे सहा मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा 1 हजारहून कमी मतांनी पराभव झाला होता. सध्या भाजपा नेत्यांनी पाच हजारहून कमी मताधिक्याने पराभव झालेल्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहेत.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपा