शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची 30% पगार कपात?, जाणून घ्या व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 17:08 IST

देशात गेल्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन सुरू असून १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा परिणाम देशातील सर्वच घटकांवर झाला आहे

नवी दिल्ली - लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून सरकारी तिजोरी संकटात सापडली आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल वाढविण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सरकारकडून काही  उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळेच, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. त्यानुसार, केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत केंद्रीयमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

देशात गेल्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन सुरू असून १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा परिणाम देशातील सर्वच घटकांवर झाला आहे. अगदी कामगार, मजूरांपासून ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळेच, कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्यासाठी, पीएम केअर फंडात निधी देण्याची विनंतीही त्यांनी केली होती. शासन स्तरावरही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच सरकार परिस्थितीनुरूप निर्णय घेत आहे. त्यातून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात कुठलीही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आता, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. मात्र, पीआयबीने याबाबत खुलासा केला आहे. 

टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या वृत्ताचा हवाला देत, केंद्र सरकारकडे असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. तसेच, तसेच, यापूर्वीच मंत्रीमहोदयांनी ते नकारले आहे, असेही पीआयबीने स्पष्ट करत संबंधित वृत्त चुकीचे असल्याचे म्हटलं आहे. पीआयबीचे हे ट्विट केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी रिट्विट करत ही फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पगारात जुलै २०२१ पर्यंत कुठलीही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. १ जानेवारी २०२० ते जुलै २०२१ पर्यंत केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वेतनात वाढ मिळणार नाही. म्हणजेच, जवळपास दीड वर्षे या सरकारी लाभधारकांना अधिकचा भत्ता आणि पैसे मिळणार नाहीत. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही केंद्राचा हा नियम लागू असणार आहे. या सर्व कर्मचारी आणि लाभधारकांना सद्यस्थितीतील वेतनानुसार पगार मिळेल, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Governmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीViral Photosव्हायरल फोटोज्ministerमंत्रीTwitterट्विटर