शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

चीनची खुमखुमी थांबता थांबेना, अरुणाचलमधील ठिकाणांना दिली आणखी ३० नवी नावेे; भारताने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 06:48 IST

India-China News: भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीनने त्या राज्यातील ठिकाणांना आणखी ३० नवी नावे दिली आहेत. अशा नवीन नावांच्या चार याद्या चीनने आतापर्यंत प्रसिद्ध केल्या.

बीजिंग - भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीनने त्या राज्यातील ठिकाणांना आणखी ३० नवी नावे दिली आहेत. अशा नवीन नावांच्या चार याद्या चीनने आतापर्यंत प्रसिद्ध केल्या. अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उकरून काढून चीनने गेल्या काही आठवड्यांत अनेक कुरापती केल्या. त्या देशाचे दावे भारताने फेटाळून लावले आहेत.

भारताने म्हटले आहे की, चीनने अरुणाचल प्रदेशबद्दल कितीही कांगावा केला तरी त्याने वस्तुस्थिती बदलत नाही. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे व यापुढेही राहणार आहे. त्यामुळे त्या राज्यातील ठिकाणांना चीनने दिलेली नवी नावे निरर्थक ठरतात. 

नवी नावे येत्या १ मेपासून चीनने अरुणाचल प्रदेशला झांगनान असे नाव दिले असून तो दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. यासंदर्भात चीनच्या नागरी घडामोडी मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांना दिलेली आणखी ३० नवी नावे प्रसिद्ध केली आहेत. ही नवी नावे येत्या १ मेपासून प्रचलित होतील, असा दावाही चीनने केला आहे. 

चीनने आजवर प्रसिद्ध केल्या ४ याद्या- अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत तेथील सहा ठिकाणांना नवी नावे देण्याची चीनने आगळीक केली होती. तशी पहिली यादी त्या देशाने २०१७ साली प्रसिद्ध केली. - २०२१ साली प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या यादीत १५, तर २०२३ मध्ये तिसऱ्या यादीत ११ ठिकाणांना चीनने नवीन नावे देऊन भारताची कुरापत काढली होती. आता त्या देशाने चौथी यादी प्रसिद्ध केली आहे.

चीन-भारतातील तणाव कायमपूर्व लडाखमधील सीमाप्रश्नावरून भारत व चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हा तणाव आणखी वाढला होता. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून दोन्ही देशांचे लष्कर मागे घेण्याच्या मुद्द्यावरून चीनने अडवणुकीची भूमिका घेतली आहे. अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीन भारताच्या कुरापती काढत आहे.

केंद्रातील भाजप सरकारने बांगलादेशला १५ हजार एकर जमीन का दिली? भाजपचे केंद्र सरकार श्रीलंकेशी युद्ध करून कच्चाथीवू बेट परत ताब्यात घेणार आहे का? भाजप सरकारने चीनला हजारो किमी जमीन का दिली.  - पवन खेडा, काँग्रेस नेते.

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे व भविष्यातही राहणार आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले आहे. अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलून चीनच्या हाती काहीही लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ~ - एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

चीनची बांगलादेशला मदतचीनच्या मदतीने बांगलादेशमध्ये पाणबुड्यांसाठी तळ बनविण्याला जात असून, त्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या तळाची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे भारताची चिंता वाढविणारी आहेत. एका छायाचित्रात ड्राय डॉक दिसत असून, तिथे पाणबुड्यांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. बांगलादेशातील कॉक्स बाजार येथील पेकुआ येथे बीएनएस शेख हसीना या नावाचा पाणबुडीतळ बांधण्यात आला आहे. तिथे चीनच्या पाणबुड्यांच्या दुरुस्तीचे काम होईल.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश