शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

चीनची खुमखुमी थांबता थांबेना, अरुणाचलमधील ठिकाणांना दिली आणखी ३० नवी नावेे; भारताने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 06:48 IST

India-China News: भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीनने त्या राज्यातील ठिकाणांना आणखी ३० नवी नावे दिली आहेत. अशा नवीन नावांच्या चार याद्या चीनने आतापर्यंत प्रसिद्ध केल्या.

बीजिंग - भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीनने त्या राज्यातील ठिकाणांना आणखी ३० नवी नावे दिली आहेत. अशा नवीन नावांच्या चार याद्या चीनने आतापर्यंत प्रसिद्ध केल्या. अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उकरून काढून चीनने गेल्या काही आठवड्यांत अनेक कुरापती केल्या. त्या देशाचे दावे भारताने फेटाळून लावले आहेत.

भारताने म्हटले आहे की, चीनने अरुणाचल प्रदेशबद्दल कितीही कांगावा केला तरी त्याने वस्तुस्थिती बदलत नाही. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे व यापुढेही राहणार आहे. त्यामुळे त्या राज्यातील ठिकाणांना चीनने दिलेली नवी नावे निरर्थक ठरतात. 

नवी नावे येत्या १ मेपासून चीनने अरुणाचल प्रदेशला झांगनान असे नाव दिले असून तो दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. यासंदर्भात चीनच्या नागरी घडामोडी मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांना दिलेली आणखी ३० नवी नावे प्रसिद्ध केली आहेत. ही नवी नावे येत्या १ मेपासून प्रचलित होतील, असा दावाही चीनने केला आहे. 

चीनने आजवर प्रसिद्ध केल्या ४ याद्या- अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत तेथील सहा ठिकाणांना नवी नावे देण्याची चीनने आगळीक केली होती. तशी पहिली यादी त्या देशाने २०१७ साली प्रसिद्ध केली. - २०२१ साली प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या यादीत १५, तर २०२३ मध्ये तिसऱ्या यादीत ११ ठिकाणांना चीनने नवीन नावे देऊन भारताची कुरापत काढली होती. आता त्या देशाने चौथी यादी प्रसिद्ध केली आहे.

चीन-भारतातील तणाव कायमपूर्व लडाखमधील सीमाप्रश्नावरून भारत व चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हा तणाव आणखी वाढला होता. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून दोन्ही देशांचे लष्कर मागे घेण्याच्या मुद्द्यावरून चीनने अडवणुकीची भूमिका घेतली आहे. अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीन भारताच्या कुरापती काढत आहे.

केंद्रातील भाजप सरकारने बांगलादेशला १५ हजार एकर जमीन का दिली? भाजपचे केंद्र सरकार श्रीलंकेशी युद्ध करून कच्चाथीवू बेट परत ताब्यात घेणार आहे का? भाजप सरकारने चीनला हजारो किमी जमीन का दिली.  - पवन खेडा, काँग्रेस नेते.

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे व भविष्यातही राहणार आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले आहे. अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलून चीनच्या हाती काहीही लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ~ - एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

चीनची बांगलादेशला मदतचीनच्या मदतीने बांगलादेशमध्ये पाणबुड्यांसाठी तळ बनविण्याला जात असून, त्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या तळाची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे भारताची चिंता वाढविणारी आहेत. एका छायाचित्रात ड्राय डॉक दिसत असून, तिथे पाणबुड्यांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. बांगलादेशातील कॉक्स बाजार येथील पेकुआ येथे बीएनएस शेख हसीना या नावाचा पाणबुडीतळ बांधण्यात आला आहे. तिथे चीनच्या पाणबुड्यांच्या दुरुस्तीचे काम होईल.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश