शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दिल्लीच्या दुर्घटनेतील ३ मृतदेह सापडले; पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या ८ वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 11:53 IST

दिल्लीतील पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मुसळधार पावसामुळे येथील वसंत विहार परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यातून शनिवारी तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. यासह दिल्लीतील पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. शुक्रवारी वसंत विहार भागात बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली. घटनेची माहिती दिल्ली आपत्ती निवारण विभागाला पहाटे मिळाली. यांनतर तेथे बचावकार्य सुरू झाले. ढिगाऱ्यातून तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संतोषकुमार यादव (१९) आणि संतोष (३८) अशी दोघांची नावे आहेत. तिसऱ्या मृत मजुराची ओळख अद्याप पटलेली नाही. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलेले आहेत की नाही, यासाठी शोधमोहीम सुरू आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नागरी संस्थांचे पथक संयुक्त बचाव मोहिमेत काम करीत आहेत. तसेच शुक्रवारी पावसाशी संबंधित इतर घटनांमध्ये शहरात पाच जण मृत्युमुखी पडले आहेत.

‘आयएमडी’कडून ऑरेंज अलर्ट जारीदिल्लीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी सांगितले. ८८ वर्षांतील सर्वांत मुसळधार पावसासह दिल्लीत मान्सूनचे आगमन झाले आहे; तसेच पुढील चार दिवस शहरात मुसळधार पावसासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

अयोध्येत रामपथ जलमय, ६ अभियंते निलंबित२३ जून व २५ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात रामपथ काही ठिकाणी खचला तसेच तिथे अनेक भागांत पाणी साचले. काही घरे जलमय झाली. त्यामुळे नागरी सुविधा उत्तम स्थितीत राखण्यात निष्काळजीपणा दाखवल्याच्या आरोपावरून तेथील सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. रामपथ व त्याला लागून असलेले १५ उपमार्ग पावसामुळे जलमय होऊन तेथील रहिवाशांचे खूप हाल झाले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता ध्रुव अग्रवाल, सहायक अभियंता अनुज देशवाल, कनिष्ठ अभियंता प्रभात पांडे, उत्तर प्रदेश जल निगमचे आनंदकुमार दुबे (कार्यकारी अभियंता), राजेंद्रकुमार यादव (सहायक अभियंता), मोहम्मद शाहिद (कनिष्ठ अभियंता) यांना निलंबित करण्यात आले आहे. रामपथ बांधल्यानंतर काही दिवसांतच तिथे खड्डे पडले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीRainपाऊसDeathमृत्यू