शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

26/11 Terror Attack: 'आम्ही हे कधीच विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 11:38 IST

26/11 Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

श्रीनगर - मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. पाकिस्तानमधून समुद्रामार्गे आलेल्या दहशतवाद्यांच्या पथकाने मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 168 लोकांचा मृत्यू झाला. मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात एकूण 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. याच दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 

आम्ही हे कधीच विसरणार नाही असं म्हणत जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध करण्यात आला आहे. गुपकर, राजबाग, टीआरसी, बारामालू आणि हैदरपुरा या भागात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचा उल्लेख करत आम्ही पाकिस्तानी लोकांनी जे केले ते कधीच विसरणार नाही असं म्हटलं आहे. तसेच हल्ल्याबाबत पोस्टरवर, "या दहशतवाद्यांनी कोणतीही दया दाखवली नाही, यांनी आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान आणि त्याच्या पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर रोजी दहशत निर्माण केली. दहशतवादाविरोधात देश एकत्र आहे" असं म्हटलं आहे.

26/11 च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे परिसरासह समुद्रकिनारी गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी मुंबई पोलीस दल अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज केले जात आहे. हल्ल्यादरम्यान कोलमडलेला नियंत्रण कक्षही अद्ययावत बनला असून, चांगली कामगिरी बजावताना दिसत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत मुंबई पोलीसही नवनवीन तंत्रज्ञानाशी जोडले गेले. अद्ययावत वेबसाईट, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष तसेच पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली.

कसाबसह खात्मा झालेल्या 10 दहशतवाद्यांसाठी पाकमध्ये प्रार्थना करतोय हाफिज सईद

पाकिस्तानात राजकारणाचा बुरखा परिधान केलेल्या जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेने मुंबई हल्ल्यात मारले गेलेल्या 10 दहशतवाद्यांसाठी आज प्रार्थना सभेचं आयोजन केलं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार जमात-उद-दवाचे प्राबल्य असलेल्या मशिदींमध्ये संघटनेची बैठक झाली असून 2008 च्या मुंबई हल्ल्यात तब्बल 168 जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्याचं निश्चित केलं गेलं आहे. हाफिज सईदने आज थेट मारले गेलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना सभेचं आयोजन केल्यानं देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाMumbaiमुंबईTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान