शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

26/11 Terror Attack: 'आम्ही हे कधीच विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 11:38 IST

26/11 Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

श्रीनगर - मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. पाकिस्तानमधून समुद्रामार्गे आलेल्या दहशतवाद्यांच्या पथकाने मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 168 लोकांचा मृत्यू झाला. मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात एकूण 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. याच दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 

आम्ही हे कधीच विसरणार नाही असं म्हणत जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध करण्यात आला आहे. गुपकर, राजबाग, टीआरसी, बारामालू आणि हैदरपुरा या भागात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचा उल्लेख करत आम्ही पाकिस्तानी लोकांनी जे केले ते कधीच विसरणार नाही असं म्हटलं आहे. तसेच हल्ल्याबाबत पोस्टरवर, "या दहशतवाद्यांनी कोणतीही दया दाखवली नाही, यांनी आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान आणि त्याच्या पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर रोजी दहशत निर्माण केली. दहशतवादाविरोधात देश एकत्र आहे" असं म्हटलं आहे.

26/11 च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे परिसरासह समुद्रकिनारी गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी मुंबई पोलीस दल अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज केले जात आहे. हल्ल्यादरम्यान कोलमडलेला नियंत्रण कक्षही अद्ययावत बनला असून, चांगली कामगिरी बजावताना दिसत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत मुंबई पोलीसही नवनवीन तंत्रज्ञानाशी जोडले गेले. अद्ययावत वेबसाईट, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष तसेच पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली.

कसाबसह खात्मा झालेल्या 10 दहशतवाद्यांसाठी पाकमध्ये प्रार्थना करतोय हाफिज सईद

पाकिस्तानात राजकारणाचा बुरखा परिधान केलेल्या जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेने मुंबई हल्ल्यात मारले गेलेल्या 10 दहशतवाद्यांसाठी आज प्रार्थना सभेचं आयोजन केलं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार जमात-उद-दवाचे प्राबल्य असलेल्या मशिदींमध्ये संघटनेची बैठक झाली असून 2008 च्या मुंबई हल्ल्यात तब्बल 168 जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्याचं निश्चित केलं गेलं आहे. हाफिज सईदने आज थेट मारले गेलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना सभेचं आयोजन केल्यानं देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाMumbaiमुंबईTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान