शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

२.६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ५,२१५ कोटी; प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:18 IST

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत २.६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपयांप्रमाणे ५,२१५ कोटी रुपये जमा केले आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत २.६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपयांप्रमाणे ५,२१५ कोटी रुपये जमा केले आहेत. ही योजना गेल्या महिन्यात संसदेत सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ७५ हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार दोन हेक्टर लागवडीयोग्य जमीन असलेल्या सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना एका वर्षांत सहा हजार रुपये तीन हप्त्यांत विभागून दिले जातील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने अर्थसंकल्पात २० हजार कोटी रुपये या योजनेत मार्च २०१९ अखेर प्रत्येक शेतकºयाला दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी राखून ठेवले होते.उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेला राष्ट्रीय पातळीवर औपचारिक प्रारंभ गेल्या २४ फेब्रुवारी रोजी झाला होता. त्या दिवशी १.०१ कोटी शेतकºयांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला.‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २.६ कोटी छोट्या आणि सीमांत शेतकºयांच्या बँक खात्यात एकूण ५ हजार २१५ कोटी रूपये योजना जाहीर झाल्यापासून ३७ दिवसांत थेट जमा केले गेले, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी टिष्ट्वटरद्वारे सांगितले. अगदी छोट्या कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येतील लाभार्थींना अशी रक्कम दिली गेली अशी ही पहिलीच योजना असेल, असेही पीएमओने म्हटले.गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले होते की उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्याने प्रधान मंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. सात मार्चपर्यंत उत्तर प्रदेशातील ७४.७१ लाख शेतकºयांना पहिला हप्ता मिळाला तर आंध्र प्रदेशातील ३२.१५ लाख शेतकरी याच योजनेचे लाभार्थी ठरले.कोणत्या राज्यात किती आहेत लाभार्थी?गुजरातमधील २५.५८ लाख, ११.५५ लाख शेतकरी महाराष्ट्रातील, तेलंगणातील १४.४१ लाख शेतकरी आणि तमिळनाडूतील १४.०१ लाख शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरले. इतर राज्यांतील लाभार्थी शेतकºयांची संख्या अशी : हरियाना (८.३४ लाख), आसाम (८.०९ लाख) आणि ओडिशा (८.०७ लाख). केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी पात्र ठरवलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यांत केंद्र सरकार थेट हे पैसे जमा करीत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजना