शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

देशातील २५% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, घड्याळातील वेळही सांगता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:36 IST

आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या व १४ ते १८ वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो; पण दहापैकी एक चतुर्थांश मुलांना मातृभाषेतील मजकूर मात्र नीट वाचता येत नाही

नवी दिल्ली : आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या व १४ ते १८ वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो; पण दहापैकी एक चतुर्थांश मुलांना मातृभाषेतील मजकूर मात्र नीट वाचता येत नाही, असा निष्कर्ष अ‍ॅन्युअल स्टेटस आॅफ एज्युकेशन रिपोर्ट (असर)च्या अहवालातून समोर आला आहे.देशाच्या २४ राज्यांतील २४ जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल तयार करण्यात आला. सर्वेक्षणासाठी सुमारे दोन हजार स्वयंसेवकांनी ३५ संस्थांच्या मदतीने १,६४१ गावांतील २५ हजार घरांना भेटी दिल्या आणि ३० हजार मुला-मुलींशी संपर्क साधून त्यांची शैक्षणिक स्थिती जाणून घेतली. ही मुले काय करतात, त्यांची क्षमता, जागरूकता, त्यांचे ध्येय अशा चार मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून हे सर्वेक्षण करण्यात आले. हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा कसा बोजवारा उडालेला आहे, हे त्यातील निष्कर्षांनी दाखवून दिले आहे.वयाच्या १४ व्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजमध्ये पटनोंदणी न झालेल्या मुलांची संख्या ५ टक्के आहे, तर १८ वर्षांच्या मुलांचे याबाबतीत प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ हा अमलात आल्यानंतर लगेचच जी मुले आठवी इयत्ता उत्तीर्ण झाली, अशा १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक स्थितीबाबत हा अहवाल भाष्य करतो. ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, असे शिक्षण हक्क कायद्यामध्ये म्हटले आहे.असरच्या अहवालात म्हटले आहे की, १४ ते १८ वर्षे वयोगटातील २५ टक्के मुले आपल्या मातृभाषेतील मजकूर धडपणे वाचू शकत नाहीत; पण १४ वर्षे वयोगटातील ५३ टक्के मुले इंग्रजी वाक्ये वाचू शकतात. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांपैकी ५९ टक्के मुलांनी कॉम्प्युटर कधीच हाताळलेला नाही.वयाच्या १४ व्या वर्षी शाळेत मुला-मुलींची जी पटनोंदणी होते, त्या टक्केवारीत ही मुले जेव्हा १८ वर्षांची होतात, त्यावेळी बराच फरक पडलेला असतो. १८ वर्षे वयोगटातील ३२ टक्के मुलींची शाळा किंवा कॉलेजमध्ये पटनोंदणी होत नाही, तर हेच प्रमाण मुलांमध्ये २८ टक्के आहे.या मुलांपैकी ५ टक्के मुलेच फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. औपचारिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांपैकी ४२ टक्के मुले ही कमावती असतात. कमावत्या मुलांपैकी ७९ टक्के मुले कुटुंबातील शेतीत राबतात, तर ७७ टक्के मुले व ८९ टक्के मुली घरगुती कामांमध्ये गुंतलेली असतात.१४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना वित्तसंस्था, प्रसारमाध्यमे, डिजिटल वर्ल्ड याविषयी किती माहिती असते याची पडताळणी केली असता त्यातील ७३ टक्के मुलांनी मोबाईल फोनचा व्यवस्थित वापर केल्याचेही आढळून आले. मात्र, १२ टक्के मुलांनी मोबाईल आजवर कधीच वापरलेला नसून, मुलींमध्ये हे प्रमाण २३ टक्के इतके आहे.१४ ते १६ वर्षे वयोगटातील भागाकार करता येत नाही. या विद्यार्थ्यांना देशाचा नकाशा दाखविला, तर कोणत्या देशाचा हे १४ टक्के विद्यार्थ्यांना ओळखता आले नाही. त्यातील ३६ टक्के विद्यार्थ्यांना देशाच्या राजधानीचे नाव माहीत नव्हते. इतकेच नव्हे तर ते कोणत्या राज्यात राहतात, त्याचे नावही ठाऊक नव्हते.या विद्यार्थ्यांपैकी एक चतुर्थांश विद्यार्थ्यांना पैसे मोजणे नीट जमत नव्हते. ४० टक्के मुलांना घड्याळ बघून नेमके किती वाजलेत ते सांगता आले नाही. ४४ टक्के मुलांनी वजनाच्या मोजणीतही चुका केल्या.

टॅग्स :Studentविद्यार्थी