शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

देशातील २५% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, घड्याळातील वेळही सांगता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:36 IST

आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या व १४ ते १८ वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो; पण दहापैकी एक चतुर्थांश मुलांना मातृभाषेतील मजकूर मात्र नीट वाचता येत नाही

नवी दिल्ली : आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या व १४ ते १८ वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो; पण दहापैकी एक चतुर्थांश मुलांना मातृभाषेतील मजकूर मात्र नीट वाचता येत नाही, असा निष्कर्ष अ‍ॅन्युअल स्टेटस आॅफ एज्युकेशन रिपोर्ट (असर)च्या अहवालातून समोर आला आहे.देशाच्या २४ राज्यांतील २४ जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल तयार करण्यात आला. सर्वेक्षणासाठी सुमारे दोन हजार स्वयंसेवकांनी ३५ संस्थांच्या मदतीने १,६४१ गावांतील २५ हजार घरांना भेटी दिल्या आणि ३० हजार मुला-मुलींशी संपर्क साधून त्यांची शैक्षणिक स्थिती जाणून घेतली. ही मुले काय करतात, त्यांची क्षमता, जागरूकता, त्यांचे ध्येय अशा चार मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून हे सर्वेक्षण करण्यात आले. हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा कसा बोजवारा उडालेला आहे, हे त्यातील निष्कर्षांनी दाखवून दिले आहे.वयाच्या १४ व्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजमध्ये पटनोंदणी न झालेल्या मुलांची संख्या ५ टक्के आहे, तर १८ वर्षांच्या मुलांचे याबाबतीत प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ हा अमलात आल्यानंतर लगेचच जी मुले आठवी इयत्ता उत्तीर्ण झाली, अशा १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक स्थितीबाबत हा अहवाल भाष्य करतो. ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, असे शिक्षण हक्क कायद्यामध्ये म्हटले आहे.असरच्या अहवालात म्हटले आहे की, १४ ते १८ वर्षे वयोगटातील २५ टक्के मुले आपल्या मातृभाषेतील मजकूर धडपणे वाचू शकत नाहीत; पण १४ वर्षे वयोगटातील ५३ टक्के मुले इंग्रजी वाक्ये वाचू शकतात. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांपैकी ५९ टक्के मुलांनी कॉम्प्युटर कधीच हाताळलेला नाही.वयाच्या १४ व्या वर्षी शाळेत मुला-मुलींची जी पटनोंदणी होते, त्या टक्केवारीत ही मुले जेव्हा १८ वर्षांची होतात, त्यावेळी बराच फरक पडलेला असतो. १८ वर्षे वयोगटातील ३२ टक्के मुलींची शाळा किंवा कॉलेजमध्ये पटनोंदणी होत नाही, तर हेच प्रमाण मुलांमध्ये २८ टक्के आहे.या मुलांपैकी ५ टक्के मुलेच फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. औपचारिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांपैकी ४२ टक्के मुले ही कमावती असतात. कमावत्या मुलांपैकी ७९ टक्के मुले कुटुंबातील शेतीत राबतात, तर ७७ टक्के मुले व ८९ टक्के मुली घरगुती कामांमध्ये गुंतलेली असतात.१४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना वित्तसंस्था, प्रसारमाध्यमे, डिजिटल वर्ल्ड याविषयी किती माहिती असते याची पडताळणी केली असता त्यातील ७३ टक्के मुलांनी मोबाईल फोनचा व्यवस्थित वापर केल्याचेही आढळून आले. मात्र, १२ टक्के मुलांनी मोबाईल आजवर कधीच वापरलेला नसून, मुलींमध्ये हे प्रमाण २३ टक्के इतके आहे.१४ ते १६ वर्षे वयोगटातील भागाकार करता येत नाही. या विद्यार्थ्यांना देशाचा नकाशा दाखविला, तर कोणत्या देशाचा हे १४ टक्के विद्यार्थ्यांना ओळखता आले नाही. त्यातील ३६ टक्के विद्यार्थ्यांना देशाच्या राजधानीचे नाव माहीत नव्हते. इतकेच नव्हे तर ते कोणत्या राज्यात राहतात, त्याचे नावही ठाऊक नव्हते.या विद्यार्थ्यांपैकी एक चतुर्थांश विद्यार्थ्यांना पैसे मोजणे नीट जमत नव्हते. ४० टक्के मुलांना घड्याळ बघून नेमके किती वाजलेत ते सांगता आले नाही. ४४ टक्के मुलांनी वजनाच्या मोजणीतही चुका केल्या.

टॅग्स :Studentविद्यार्थी